Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सिंधुदुर्ग-पुणे विमानसेवा आठवड्यातून ५ वेळा

सिंधुदुर्ग-पुणे विमानसेवा आठवड्यातून ५ वेळा

कुडाळ : प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत, गोवास्थित फ्लाय ९१ विमानसेवेने सिंधुदुर्ग (चिपी विमानतळ) ते पुणे या मार्गावरील सेवा आता आठवड्यातून पाच दिवस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी ही सेवा आठवड्यातून दोनदाच उपलब्ध होती. वाढलेली वारंवारता पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमधील प्रवास अधिक सुलभ करणार असून, या भागातील पर्यटन, व्यवसाय आणि सामाजिक संपर्क वाढण्यास मोठी चालना मिळणार आहे.

सध्या फ्लाय९१ ही विमानसेवा कमी सुविधा असलेल्या भागांना इतर शहरांशी सहजपणे जोडण्यावर भर देत असून, या माध्यमातून प्रादेशिक विकासाला चालना देण्याचे कार्य करत आहे. विमानसेवेची वारंवारता वाढल्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग-व्यवसायांना नव्या संधी मिळण्याची आणि आर्थिक व्यवहार अधिक गतिमान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अलीकडेच सिंधुदुर्ग-पुणे विमान वाहतूक सुरूही झाली आहे. गेले काही महिने चिपी ते मुंबई ही नियमित सुरू असलेली सेवा बंद झाली होती.

ही सेवा पुन्हा मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई अशी सुरू करण्यासाठी उड्डाण संचालनालयाने विशेष धोरण अंमलात आणावे, यासाठी खासदार राणे आग्रही. होते. त्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेत सिंधुदुर्ग विमानतळावरील सेवा किती महत्त्वाची आहे, याशिवाय विमानतळावरील अन्य सेवा, सुविधा, समस्यांकडे लक्ष वेधले होते. यानंतर वेगाने कार्यवाही होत सिंधुदुर्ग विमानतळावरील अनेक सेवासुविधा अपडेट करण्यात येत आहेत. अलायन्स एअरने मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबईदरम्यान उड्डाणे सुरू केली. पर्यटक, स्थानिक प्रवासी आणि जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला मिळणारी उभारी लक्षात घेता सिंधुदुर्गसाठी आरसीएस आणखी पाच वर्षांसाठी वाढवावी, सिंधुदुर्गसाठी अलायन्स एअर सेवा पुन्हा सुरू करावी, अशी भूमिका खासदार राणे यांनी स्पष्ट केली होती. सिंधुदुर्ग-पुणे विमानसेवा आठवड्यातून पाच वेळा सुरू होत असल्याने राणेंच्या पाठपुरवठ्याला यश आले आहे

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!