Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Flood Relief Norms Change: शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा दिलासा! अतिवृष्टी आणि पूरग्रस्त मदतीचे नियम बदलले; आता सरसकट…

Flood Relief Norms Change: शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा दिलासा! अतिवृष्टी आणि पूरग्रस्त मदतीचे नियम बदलले; आता सरसकट…

Flood Relief Norms Change: राज्यातील बळीराजाला आधार देण्यासाठी फडणवीस सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. गेल्या वर्षीच्या महापूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालण्यासाठी सरकारने जुन्या जाचक नियमांत बदल करून मदतीचा ओघ वाढवला आहे. कर्जमाफीसोबतच आता पशुपालकांसाठीही मदतीची द्वारे खुली करण्यात आली आहेत.

मदतीचे नियम बदलले; कोणाला होणार फायदा?
पूर्वी केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनाच मदतीसाठी पात्र मानले जात होते. मात्र, आता नव्या निर्णयानुसार सर्व बाधित पशुपालक मदतीसाठी पात्र ठरतील. याशिवाय, जनावरांच्या संख्येवर असलेली मर्यादाही सरकारने शिथिल केली आहे.

प्रमुख बदल खालीलप्रमाणे आहेत

  • मर्यादा हटवली: पूर्वी ठराविक संख्येपर्यंतच जनावरांची मदत मिळत असे (उदा. कमाल ३ दुधाळ जनावरे). आता मात्र पुरात मृत पावलेल्या किंवा बेपत्ता झालेल्या सर्व जनावरांसाठी सरकार मदत देणार आहे.
  • कुक्कुटपालन: पक्ष्यांच्या संख्येवर असलेली मर्यादा काढून टाकण्यात आली असून, सर्व मृत पक्षांची भरपाई दिली जाईल.
  • भूमिहीन पशुपालक: ज्यांच्याकडे जमीन नाही पण पशुपालन करतात, अशा बाधित व्यक्तींनाही आता सरकारी मदतीचा लाभ मिळेल.

कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ
अतिवृष्टीच्या मदतीसोबतच सरकारने पीक कर्जमाफीचाही आढावा घेतला आहे:
१. दोन लाखांची कर्जमाफी: ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ज्यांचे पीक कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत माफी मिळेल.
२. नियमित कर्जदारांना लाभ: जे शेतकरी वेळेवर कर्जफेड करतात, त्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!