Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

खून और क्रिकेट एक साथ कैसे बहेगा? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल

खून और क्रिकेट एक साथ कैसे बहेगा? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : एशिया कप २०२५ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावरून राजकीय वाद चव्हाट्यावर आला आहे. १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुबईत होणाऱ्या या सामन्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (युती) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध हिंदू पुरुष पर्यटक मारले गेले, त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली, तरीही क्रिकेट सामना का होतोय? असा सवाल उपस्थित करत ठाकरे म्हणाले, “खून और पानी एक साथ नहीं बह सकता, हे मोदींनी म्हटलं होतं.

आता खून और क्रिकेट एक साथ कैसे बहेगा? हे मोदींनी सांगावं!” भाजपने देशभक्तीचा बाजार मांडला असून, जय शाहांच्या हाती क्रिकेटच्या नाड्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला. सामान्यांच्या तिकिटांना प्रतिसाद मिळाला नाहीये, तरीही पैशासाठी सामना होतोय, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी पाकिस्तान-प्रायोजित दहशतवाद्यांनी २६ हिंदू पुरुष पर्यटकांना गोळ्या घालून मारले. या हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करून सटीक कारवाई केली.

पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट २०२५) म्हटले होते की, “खून और पानी एक साथ नहीं बह सकता,” आणि इंडस वॉटर ट्रीटी रद्द केली. मात्र, एशिया कप २०२५ च्या वेळापत्रकात १४ सप्टेंबरला भारत-पाक सामना ठेवण्यात आला, ज्यामुळे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. बीसीसीआय आणि आयसीसीचे नियम असल्याने सामना होतोय, पण राष्ट्रिय भावना आणि शहीदांच्या बलिदानाचा अपमान होतोय, असा युक्तिवाद विरोधक करत आहेत.

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषेदेतील मुख्य मुद्दे

“पहलगाम हल्ल्यात घाव भरले नाहीत, रक्त सुकले नाही. ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पाकिस्तानसोबत क्रिकेट कसं शक्य? डोनाल्ड ट्रम्प म्हणतात आपण युद्ध थांबवलं, नीरज चोप्राने पाकिस्तानी प्रशिक्षक आणला तर देशद्रोही ठरला. पाकिस्तान आतंकवाद पसरवतो, तरी क्रिकेट खेळणार? युद्ध आणि क्रिकेट एकत्र कसं?”

“भाजपने देशभक्तीचा व्यापार सुरू केला. जय शाह (अमित शाहांचे पुत्र) आयसीसीचे प्रमुख आहेत, त्यामुळे सामना होतोय. रविवारी सामन्यातून बक्कळ पैसा कमावला जाईल. जय शाह सामना बघायला गेल्यास ते देशद्रोही आहेत का? क्रिकेटमधली विकेट आणि शहीद यात फरक समजत नाही. विकेट गेली तर पुढचा सामना खेळता येतो, शहीद झाला तर आयुष्य उजाड होतं.”

मोदींना अजूनही संधी आहे, सामन्यावर बहिष्कार घालून चांगला संदेश देऊ शकतात. बाळासाहेब ठाकरेंनी जावेद मियांदाडला सांगितलं होतं, नाटकं बंद करा तर क्रिकेट होईल. सुषमा स्वराज हव्या होत्या, आता फक्त नावात शंकर आहेत. वल्लभभाई पटेल हवे होते. घर-घर सिंदूर मोहीम राबवणार होते, आता आम्ही सिंदूर पाठवू. रविवारी महिला घरून सिंदूर गोळा करून मोदींना पाठवतील.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!