Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

इंदापूरमध्ये शेतकऱ्याकडून २५ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी महसूल सहाय्यकाला अटक

इंदापूरमध्ये शेतकऱ्याकडून २५ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी महसूल सहाय्यकाला अटक

इंदापूर (पुणे): येथील तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या कावेरी विजय खाडे यांना शेतकऱ्याकडून २५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रेम वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील भांडगाव येथील तक्रारदार यांच्या वडिलांची ३९ गुंठे जमीन आहे. त्या जमिनीत जाण्यासाठी रस्ता नव्हता.

त्याबाबत सन २०२० पासून तहसीलदार यांच्याकडे दावा सुरू आहे. याबाबत तहसीलदार इंदापूर यांची सुनावणी होऊन निकाल देणे बाबतची प्रक्रिया बाकी होती. सदर निकालाची कागदपत्रे तक्रारदाराच्या बाजूने तयार करून द्यावे म्हणून कावेरी विजय खाडे (वय ४८ वर्षे, महसूल सहाय्यक वर्ग ३ तहसील कार्यालय इंदापूर, रा. संघवीनगर, भिगवण रोड, बारामती) यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले. त्याबाबत संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्र तक्रार केली होती.

त्यानुसारू शुक्रवार २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता सापळा रचून संबंधित महसूल सहाय्यक कावेरी खाडे यांना २५ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. त्यावरून इंदापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!