Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

हिंजवडी बस जळीत हत्याकांड प्रकरणातील आरोपीला डिस्चार्ज मिळताच अटक; तीन दिवसांची पोलीस कोठडी

हिंजवडी बस जळीत हत्याकांड प्रकरणातील आरोपीला डिस्चार्ज मिळताच अटक; तीन दिवसांची पोलीस कोठडी

पिंपरी : कंपनी प्रशासन आणि कर्मचाऱ्यांवरील रागातून वाहनचालकाने बसला आग लावली. यामध्ये चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना हिंजवडी येथे घडली. दरम्यान यामध्ये आरोपी बसचालक जखमी झाला होता. त्याला गुरुवारी (दि.२७) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच हिंजवडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जनार्दन निळकंठ हंबर्डीकर (वय ५६, रा. वारजे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

जनार्दन हा हिंजवडी फेज दोन येथील व्योम ग्राफिक्स या कंपनीत चालक म्हणून काम करत होता. १९ मार्च रोजी सकाळी तो कंपनीतील १२ कर्मचाऱ्यांना घेऊन कंपनीत येत होता. त्याने अगोदरच कंपनीतून वेन्झीन नावाचे केमिकल गाडीत ठेवले होते. वारजे येथून त्याने सकाळी काडीपेटी खरेदी केली होती. कंपनीपासून काही अंतरावर आल्यानंतर त्याने बेन्झीन केमिकलच्या साहाय्याने बसमध्ये आग लावली. या घटनेत चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. हा अपघात नसून घातपात असल्याचे पोलीस तपासात समोर आले. चालक जनार्दन हा देखील जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान तो मेडिकल कस्टडीमध्ये उपचार घेत होता. त्याला गुरुवारी डिस्चार्ज मिळताच हिंजवडी पोलिसांनी त्याला अटक केली.

त्यानंतर न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला तीन दिवसांची (दि.२९) पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान जनार्दन याने कंपनीने त्याचा पगार थकवला, त्याला बोनस दिला नसल्याचे आरोप केले होते. कंपनीवर केलेले आरोप कंपनी मालकाने फेटाळून लावले आहेत. त्यामुळे या घटनेमागे आणखी काही कारण आहे का? याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!