Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nilesh Ghaywal : निलेश घायवळच्या वकिलांचा कोर्टात मोठा दावा; अटक टाळण्यासाठी धडपड

Nilesh Ghaywal : निलेश घायवळच्या वकिलांचा कोर्टात मोठा दावा; अटक टाळण्यासाठी धडपड

पुणे : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणाने खळबळ माजली असताना, गुन्हेगार निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) यांच्या वकिलांनी कोर्टात मोठा दावा केला आहे. घायवळ आणि गोळीबारातील आरोपींमध्ये काहीही संबंध नसल्याचे आणि घायवळ त्यांना ओळखतच नसल्याचे सांगत, वकील विपुल दुशींग यांनी मीडियाच्या दबावाखाली पोलिसांनी घायवळचे नाव जोडल्याचा आरोप केला आहे.

या प्रकरणात बॉम्बे हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करण्यात आली असून, ती येत्या काळात सुनावणीसाठी येईल. दुसरीकडे, घायवळची आई कुसुम घायवळ यांनी मुलाच्या राजकीय महत्वाकांक्षेवर आधारित षड्यंत्राचा दावा केला असून, या घटनेने पुण्याच्या गुन्हे नियंत्रणावर नव्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत.

वकिलांचा दावा काय?

घायवळचे वकील विपुल दुशींग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कोथरूडमधील गोळीबार ही केवळ रस्त्यावर अचानक भडकलेल्या भांडणाची घटना आहे. “एक गट दुसऱ्या गटावर गोळीबार करून एक व्यक्ती जखमी झाली. पुणे पोलिसांनी पहिल्या दिवशीच स्पष्ट केले होते की, यात कोणत्याही गँगचा किंवा मोठ्या संघटनेचा संबंध नाही. ही फक्त रस्त्यावरील वैमनस्याची केस आहे. पण मीडियाच्या दबावामुळे पोलिसांना घायवळचे नाव जोडावे लागले का? हे तपासून पहावे म्हणून आम्ही रिट पिटिशन दाखल केली आहे.”

दुशींग पुढे म्हणाले, “घायवळच्या म्हणण्याप्रमाणे, पकडलेले मारेकरी आणि घायवळ यांच्यात कुठल्याही प्रकारची ओळख नाही. त्यांची गाठभेट झालेली नाही, फोनवर बोललेले नाहीत. तरीही त्याचे नाव या प्रकरणात गोवले गेले, ही बाब आम्ही कोर्टात चॅलेंज करत आहोत. एमसीओसीआ (Maharashtra Control of Organised Crime Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, पण पुरावा काय? हे सगळे मीडियाच्या हायपमुळे झाले आहे.” या पिटिशनमध्ये पोलिसांच्या तपास प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करून घायवळला तात्पुरती अटक टाळण्याची मागणी करण्यात आली आहे.

आईचा भावनिक स्फुरण

घायवळची आई कुसुम घायवळ यांनी मुलाच्या बचावात भावनिक पद्धतीने बोलताना सांगितले की, “माझ्या लेकराला पळून जायचं नव्हतं. मी स्वतः त्याला विमानतळावर सोडायला गेले होते. पासपोर्टमध्ये कोणताही घोटाळा नाही. राजकारणी लोक त्याला त्रास देण्यासाठी हे सगळे करत आहेत.” कुसुम म्हणाल्या, “निलेश आणि त्याचा भाऊ दोघेही राजकारणात उतरायचे होते. नगर जिल्ह्यातील सोनेगाव जिल्हा परिषदेतून निलेश उभा राहणार होता. दोन महिन्यांत निवडणुका आहेत, त्यामुळे विरोधकांनी कट रचून त्याला अडकवले. सोनेगावमध्ये त्याला राजकारणात डोकं काढू दिलं जात नव्हतं, म्हणून त्रास होत होता.”

पुढे त्या म्हणाल्या, “मी आई आहे, खोटं बोलणार नाही. माझी दोन मुले आहेत. कोणती आई आपल्या मुलांना पळवायला सांगेल? खून करायला सांगेल? गेल्या काही वर्षांत निलेशने गुन्हेगारीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. सुखाने जगायचं ठरवलं होतं. पण राजकारणी लोक त्याला शांत जगू देत नाहीत. हे मोठं राजकीय षड्यंत्र आहे.” कुसुम यांनी घायवळच्या घरावर पोलिसांनी छापा टाकून जप्त केलेल्या शस्त्रकारव्यांबाबतही निषेध व्यक्त केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!