पुणे: ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे वयाच्या 86 व्या निधन झाले आहे. वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. खगोल शास्त्र आणि विज्ञान कथा सरळ भाषेत लिहिण्याच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी ओळखले जाणारे नारळीकर, त्यांच्या मागे अभूतपूर्व कार्याचा वारसा सोडून गेले आहेत. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत, नारळीकर यांनी टाटा मुलभूत संशोधन आणि आयुका संस्थेसारख्या प्रमुख संस्थांमध्ये काम केले, जिथे त्यांनी त्यांच्या कामाने महत्त्वाची भूमिका बजावली.
नारळीकर यांचे कार्य मोलचे आहे, कारण ते मराठीतील विज्ञानकथांचे एक विपुल लेखक देखील होते. गुंतागुंतीच्या संकल्पना सोप्या पद्धतीने मांडण्याची त्यांच्यात उत्तम कुशलता होती. भारताचे आजचे खगोलशास्त्रात जी प्रगती आहे त्यामध्ये जयंत नारळीकर यांचे महत्वाचे योगदान आहे.


