Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अखेर ७ तासांनंतर खासदार सुप्रिया सुळेंनी उपोषण सोडले; २ मे पासून रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार

अखेर ७ तासांनंतर खासदार सुप्रिया सुळेंनी उपोषण सोडले; २ मे पासून रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार

पुणे: भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या साडे सातशे मीटरचा रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे. तो रस्ता क्रॉंक्रीटीचा करण्यात यावा, या मागणीसाठी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे या पुणे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर उपोषण करत ठिय्या आंदोलनास बसल्या होत्या. जोपर्यंत संबंधित रस्त्याच्या कामाची तारीख सांगत नाही, तोपर्यंत उपोषण सुरु राहणार असल्याचे सुळे यांनी सांगितले होते. अखेर त्यांनी 2 मे ला कामाला सुरुवात करण्याच्या लिखित आश्वासनानंतर सुप्रिया सुळे यांनी उपोषण सोडले आहे. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे.

उपोषण मागे घेताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग गेट या रस्त्याची प्रचंड प्रमाणात दूरवस्था झाली आहे. हा रस्ता दुरुस्त करावा, या मागणीसाठी गेली अनेक महिने सातत्याने पाठपुरावा करत आहे. परंतु, शासन- प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नव्हती. या शासकीय अनास्थेला कंटाळून मी आज (दि. ९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी १० वाजल्यापासून उपोषण केले. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता प्रशासनाने भेट घेऊन येत्या २ मे २०२५ पासून काम सुरु करण्याचे लिखित स्वरूपात आश्वासन दिले. या आश्वासनानंतर मी माझे उपोषण मागे घेतले. हे काम विहीत वेळेत पुर्ण करण्याचा शब्द जर प्रशासनाने पाळला नाही तर पुन्हा एकदा आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा देखील यावेळी दिला.

बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने मला मोठ्या विश्वासाने निवडणून दिले आहे. त्यांच्या हिताची कामे शासनाने केली पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा आम्ही करीत असतो. परंतु, शासन आणि प्रशासनाकडून अडवणूक होत असेल, तर नाईलाजाने संघर्षाची भूमिका घ्यावी लागते. आशा आहे की, शासन अथवा प्रशासनाकडून यापुढे जनहिताच्या कामांबाबत अडवणूकीची भूमिका घेतली जाणार नाही, असे देखील सुळे यांनी म्हटले आहे. यावेळी या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार त्यांनी मानले.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!