Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातील तीनही अहवाल राज्य शासनाला सादर; आता लक्ष कारवाईकडे

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातील तीनही अहवाल राज्य शासनाला सादर; आता लक्ष कारवाईकडे

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशाअभावी उपचार करण्यास नकार दिल्यामुळे २९ मार्च रोजी झालेल्या दुर्दैवी घटनेत तनिषा भिसे (वय २७) या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. याबाबत राज्य शासनाच्या तीन समिती चौकशी करीत होत्या. यापैकी राज्य आरोग्य विभागाचा आणि पुणे धर्मादाय आयुक्तांचा अहवाल यापूर्वीच सादर करण्यात आला आहे. या दोन्ही अहवालात दीनानाथ रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. आता पुणे महापालिकेच्या, माता-मृत्यू विभागाचा अहवाल सादर करण्यात आला आहे.

राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली होती. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी माता मृत्यू अन्वेषण समितीकडून चौकशी होणार आणि त्यांचा सुद्धा अहवाल येणार असल्याचे सांगितले होते. शुक्रवारी (दि. ११ एप्रिल) पुणे महापालिकेच्या माता-मृत्यू अन्वेषण समितीचा अहवालही प्रशासनास सादर करण्यात आल्याची माहिती रूपाली चाकणकर यांनीच आपल्या एक्स या हँडलवरून दिली आहे.

रूपाली चाकणकर म्हणाल्या की, तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणातील दोन्ही चौकशी अहवालावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे राज्य शासनाने दोन्ही अहवालाच्या अनुषंगाने तातडीने कारवाई करावी. याप्रकरणी राज्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या चार सदस्यांच्या समितीने आपल्या आहवालात रुग्णालयावर ठपका ठेवला होता. त्यानंतर पुणे धर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर यांनी देखील आपला आहवाल सादर करत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर धर्मादाय रुग्णालयाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे.

पुणे सह धर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर यांच्यासह यमुना जाधव आणि इतर तीन अशा एकूण पाच सदस्यांचा या समितीत समावेश होता. तर पुणे महापालिकेच्या माता मृत्यू विभागाने आपला आहवाल राज्य शासनाला आज सादर केला आहे. त्यामुळे राज्य सरकार आता दीनानाथ रुग्णालयावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!