Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अजितदादानंतर बारामती कोणाची? सुनेत्रा पवारांच्या विरोधात कोण कोण मैदानात? रोहित पवारांचं ट्वीट चर्चेत

अजितदादानंतर बारामती कोणाची? सुनेत्रा पवारांच्या विरोधात कोण कोण मैदानात? रोहित पवारांचं ट्वीट चर्चेत

Baramati News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करत असून या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे.

सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी अर्जासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. भुजबळ हे या निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणूनही भूमिका बजावणार आहेत.

दरम्यान, महाविकास आघाडीत सुरुवातीला पेच निर्माण झाला होता. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुनेत्रा पवारांविरुद्ध उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही निवडणूक न लढवण्याची भूमिका घेतली. मात्र काँग्रेसने अ‍ॅड. आकाश मोरे यांना उमेदवारी देत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

आकाश मोरे हे माजी आमदार विजय मोरे यांचे पुत्र असून स्थानिक पातळीवर सक्रिय काँग्रेस कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले असून त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या ट्वीटनेही चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी बारामतीकरांना आवाहन करत, ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच जर निवडणूक झालीच, तर “अजितदादाच ही निवडणूक लढवत आहेत” असे समजून सुनेत्रा पवार यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

दुसरीकडे विरोधकांनी हा प्रस्ताव फेटाळत लोकशाहीत निवडणूक लढवणे हा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी विरोधकांवर टीका करत, कोणीही समोर उभे राहिले तरी सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी विजयी होतील, असा दावा केला.

तर काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांनीही लढतीचा निर्धार व्यक्त करत जनतेच्या प्रश्नांवर भर देणार असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे बारामतीत आता थेट राजकीय लढत रंगणार हे स्पष्ट झाले आहे.

 

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!