Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

धक्कादायक! पुण्यात मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याची 6 गाड्यांना धडक; गुन्हा दाखल

धक्कादायक! पुण्यात मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याची 6 गाड्यांना धडक; गुन्हा दाखल

Pune Crime: पुणे ग्रामीण भागातील रांजणगाव एमआयडीसी परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलने सहा वाहनांना जोरदार धडक देत अनेकांना गंभीर जखमी केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, हा कॉन्स्टेबल स्वतः रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. मात्र, घटनेनंतरही त्याला अटक करण्यात आलेली नाही, तसेच वैद्यकीय तपासणीही केली गेलेली नाही, यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कॉन्स्टेबलचे नाव हेमंत इनामे असे असून, तो रविवारी रात्री एका पार्टीला गेला होता. पार्टीदरम्यान त्याने मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन केले आणि त्यानंतर दारूच्या नशेतच कार चालवून तो पुणे–नगर महामार्गावर आला. गाडीवरील ताबा सुटल्याने इनामेने सलग सहा वाहनांना धडक दिली, ज्यामध्ये अनेक नागरिक जखमी झाले. तसेच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा – पुणेकरांची दिवाळी यंदा धूमधडाक्यात, फटाक्यांच्या दुकानांबाबत आयुक्तांचा खास निर्णय, वाचा

अपघातानंतरही पोलिसांची निष्क्रियता

अपघातानंतर रांजणगाव पोलिसांनी केवळ गुन्हा नोंदवण्यापुरतेच पाऊल उचलले, परंतु आरोपी कॉन्स्टेबलला ना अटक करण्यात आली, ना वैद्यकीय तपासणी केली गेली. त्यामुळे या प्रकरणात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.

नागरिकांचा संताप आणि कठोर कारवाईची मागणी

या अपघातात अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला असता, तरीही आरोपी पोलीस मोकाट फिरत आहे, हे पाहून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे सखोल चौकशी करून संबंधित कॉन्स्टेबलवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या सामान्य नागरिकांवर कठोर कारवाई केली जाते, पण कायद्याचे रक्षण करण्याची शपथ घेतलेल्या व्यक्तीनेच कायदा तोडला, तरीही कारवाई होत नसल्याने हा प्रकार पोलिस यंत्रणेवरील विश्वासाला धक्का देणारा ठरत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!