Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nashik Farmer Death: कांदा झाकायला गेलं अन् होत्याचं नव्हतं झालं! झाड अंगावर पडून नाशिकमधील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Nashik Farmer Death: कांदा झाकायला गेलं अन् होत्याचं नव्हतं झालं! झाड अंगावर पडून नाशिकमधील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Nashik Farmer Death: अस्मानी संकटापासून आपले पीक वाचवण्यासाठी केलेल्या धडपडीचा शेवट अत्यंत भीषण झाला आहे. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील बिजोटे येथील बापू सखाराम जाधव (६०) या अल्पभूधारक शेतकऱ्याचा वादळी वाऱ्यामुळे अंगावर झाड कोसळून मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी कांदा झाकण्यासाठी शेताकडे जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली.

लग्नाची लगबग सोडून पीक वाचवण्याची चिंता
बापू जाधव हे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी नामपूरला गेले होते. मात्र, दुपारी अचानक निसर्गाचे रूप बदलले. सोसाट्याचा वारा सुटल्याने आणि आभाळ भरून आल्याने, शेतात उघड्यावर पडलेला कांदा भिजेल या भीतीने ते अस्वस्थ झाले. आनंदाचा सोहळा अर्धवट सोडून ते आपल्या ‘लुना’वरून तातडीने शेताच्या दिशेने निघाले. मात्र, हीच त्यांची शेवटची सफर ठरली.

वादळाचा जीवघेणा तडाखा
बिजोटे-आखतवाडे रस्त्यावरील शिवाजी महाराज महाविद्यालय परिसरात ते पोहोचले असता, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रस्त्याकडेच्या झाडाची एक अजस्त्र फांदी थेट त्यांच्या अंगावर कोसळली. झाड अंगावर पडल्याने जाधव जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले, तर त्यांची दुचाकी लांब फेकली गेली. आवाजाचा मागोवा घेत स्थानिक शेतकरी आणि सरपंच पोपट जाधव यांनी तातडीने त्यांना नामपूर ग्रामीण रुग्णालयात हलवले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉ. स्वराज देशमुख यांनी त्यांना मृत घोषित केले.

कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
जाधव कुटुंब पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. काबाडकष्ट करून पिकवलेला कांदा पावसापासून वाचवण्याच्या प्रयत्नात घरातील कर्ता पुरुष गेल्याने बिजोटे परिसरात शोककळा पसरली आहे. सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जायखेडा पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!