Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मुंबई महापालिकेत ‘ठाकरे राज’? उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यास भाजपसाठी धोक्याची घंटा; सर्वेक्षणात समोर आली धक्कादायक आकडेवारी

मुंबई महापालिकेत ‘ठाकरे राज’? उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यास भाजपसाठी धोक्याची घंटा; सर्वेक्षणात समोर आली धक्कादायक आकडेवारी

मुंबई: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ येत असताना, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ठाकरे वादळा’ची चाहूल लागली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंच्या संभाव्य युतीची चर्चा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. ही युती झाली, तर ती केवळ मुंबईपुरती मर्यादित न राहता राज्यातील आगामी राजकारणाचे गणित बदलू शकते, असे विश्लेषकांचे मत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात अलीकडे झालेल्या सलग भेटींमुळे शिवसेना (उद्धव गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात राजकीय सेतू बांधला जातोय का, असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे.

मुंबई महानगरपालिका (BMC) ही दोघांसाठी अस्तित्वाची लढाई मानली जात असल्याने या युतीला विशेष महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर ‘ब्रँड ठाकरे’ पुन्हा एकत्र आला, तर तो भाजपच्या विजयरथाला अडथळा ठरू शकतो, असा अंदाज वर्तविला जात आहे.

सर्वेक्षणात धक्कादायक आकडे
एका कॉर्पोरेट सर्व्हे संस्थेने भाजपसाठी केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात उघड झाले आहे की, उद्धव-राज ठाकरे जर एकत्र लढले, तर त्यांना एकूण मतांपैकी तब्बल 52 टक्के मतांचा लाभ होऊ शकतो. राजकीय विश्लेषक रोहित चंदावरकर यांनी सांगितले की, या आकडेवारीने भाजप आणि महायुती दोघांच्या गोटात खळबळ उडवली आहे. ज्या मुंबईत भाजप ‘महापौर’ बसवण्याचा निर्धार करत आहे, तिथे ठाकरे युती झाल्यास भाजपचा विजय फार अवघड ठरू शकतो.

ठाकरे युतीचा संभाव्य प्रभाव
मुंबई महानगरपालिकेतील 227 वॉर्डपैकी तब्बल 90 वॉर्डमध्ये मनसेची मतं निर्णायक ठरू शकतात. विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार, अनेक ठिकाणी मनसे उमेदवारांना विजयी उमेदवारांच्या मताधिक्यापेक्षा जास्त मतं मिळाली होती. वरळी, दादर, माहीम, घाटकोपर, विक्रोळी, मालाड आणि दिंडोशी या भागांमध्ये मनसेचा प्रभाव अद्याप ठळक आहे. या भागांतील मतदारवर्ग ठाकरे नावाशी निष्ठावान असल्याने, जर दोघे एकत्र आले, तर मराठी मतं प्रचंड प्रमाणात ठाकरे गटाकडे वळण्याची शक्यता आहे.

भाजपसाठी आव्हान की रणनीतीचा नवा टप्पा?
भाजपकडे सत्तेचा आणि विकास योजनांचा मोठा फायदा असला तरी, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने मुंबईतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात. या संभाव्य युतीमुळे भाजपकडून पुन्हा राज ठाकरे यांना जवळ घेण्याचे प्रयत्न सुरू होतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!