Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी कर्जमुक्ती व PM केअर फंडातून मदत द्या; उद्धव ठाकरेंची मागणी

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी कर्जमुक्ती व PM केअर फंडातून मदत द्या; उद्धव ठाकरेंची मागणी

मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना त्वरित मदत करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. ठाकरे यांनी सरकारकडे मागणी केली की, पीएम केअर फंडातून मदत करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी कर्जमुक्त केले जावे. त्यांनी म्हटलं की, जर सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देत नसेल, तर शिवसेना शेतकऱ्यांसोबत उभी राहणार आहे.

पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, आज सकाळपासून ते मराठवाड्यातील आपत्तीग्रस्त भागात धावत्या भेटी देत आहेत. त्यांचा हेतू फक्त जनतेला दिलासा देणे आहे, राजकारण करणं नाही. सरकारकडून दिलेली मदत तूटपुंजी असेल, तर ती स्वीकारता येणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. काही शेतकऱ्यांच्या मते, मराठवाड्यातील पूरामुळे त्यांच्या जीवनावर प्रचंड परिणाम झाला आहे. जमीन वाहून गेली, पीक सडली असून घरं आणि जनावरही पाण्यात वाहून गेले. सरकारकडून मिळणारी मदत तुटपुंजी असून, प्रत्यक्ष नुकसान भरपाईसाठी दुप्पट रक्कम लागेल, असे ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी 1,339 कोटींचे मदत पॅकेज जाहीर! दिवाळीपूर्वी मिळणार मदत; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

पंजाबसारखी मदत करण्याची मागणी

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटले की, पंजाबमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही अशीच मदत मिळावी. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती करावी किंवा हेक्टरी 50 हजार रुपये द्यावेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!