Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

HSC Result : बारावीत नापास झाल्याच्या धक्क्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

HSC Result : बारावीत नापास झाल्याच्या धक्क्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

HSC Result : भंडारा जिल्ह्यात बारावीच्या निकालानंतर दुर्दैवी घटना घडली आहे. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याचे समजल्यानंतर १८ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना तुमसर तालुक्यातील रोंघा येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नावेद होलाराम खंडाते असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने यंदा महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा दिली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर आपण नापास झाल्याचे समजताच तो मानसिक तणावात गेला होता.

शनिवारी दुपारी त्याने गावाजवळील शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, राज्याचा बारावीचा निकाल यंदा ८९.७९ टक्के लागला असून मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.

याच निकालात भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले. नूतन कन्या ज्युनिअर कॉलेजची गीतिका श्याम धूत हिने १०० टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!