Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बनावट सहीद्वारे आरोपीचे नाव दोषारोपातून वगळले; करमाळ्याच्या तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षकावर गुन्हा

बनावट सहीद्वारे आरोपीचे नाव दोषारोपातून वगळले; करमाळ्याच्या तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षकावर गुन्हा

करमाळा: तपासीय अंमलदाराने गुन्ह्यातील घटनेच्या वेळी आरोपी घटनास्थळावर होता की नाही, याबाबतचा पुरावा निष्पन्न न करता त्याचे नाव दोषारोप पत्रातून वगळले. तसेच उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याच्या बनावट सहीचे दोषारोप मंजुरीचे पत्र तयार करून आरोपीला तपासात सहकार्य केल्याच्या आरोपावरून करमाळा पोलीस स्टेशनच्या तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई गणेश महादेव शिंदे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

करमाळा पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये तपासीय अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय जाधव यांनी गुन्ह्यातील आरोपी सुहास रामचंद्र साळुंखे यास गुन्ह्याच्या दोषारोपातून वगळून आरोपपत्र दाखल केले. तसेच त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, टेंभूर्णी येथे उपचार घेतल्याच्या माहितीत तफावत दिसून आली.

यासोबतच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या सहीचे बनावट दोषारोपपत्र मंजुरीचे पत्र तयार करुन ते करमाळा पोलिसांत सादर केले आणि दोषारोप नंबर घेऊन ते उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय न्यायालयात दाखल केले. यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय जाधव (सध्या नेमणूक अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे) यांनी गुन्ह्याच्या तपासात सहकार्य केल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स.पो.नि. पी. बी. टिळेकर तपास करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!