Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ahilyanagar Election 2026 : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे दोन उमेदवार गायब; गेल्या 24 तासांपासून बेपत्ता

Ahilyanagar Election 2026 : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे दोन उमेदवार गायब; गेल्या 24 तासांपासून बेपत्ता

Ahilyanagar: महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे दोन उमेदवार (MNS Candidates) गेल्या 24 तासांपासून बेपत्ता झाले आहेत. या उमेदवारांचा त्यांच्या कुटुंबीयांशी किंवा पक्षाशी कोणताही संपर्क झालेला नाही, त्यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दबाव

मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी ही माहिती दिली. त्यांच्या मते, निवडणुकीच्या तोंडावर अशी घटना घडणे संशयास्पद आहे. विशेषतः केडगाव भाग हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. या भागात निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दबाव टाकला जात असावा आणि त्याच पार्श्वभूमीवर हे अपहरण घडले असावे, असा गंभीर आरोप सुमित वर्मा यांनी केला आहे.

राजकीय षड्यंत्र

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा घटना राजकीय षड्यंत्राची द्योतक असल्याचे बोलले जात आहे. मनसे नेत्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली असून, लवकरात लवकर उमेदवारांचा शोध घेऊन त्यांना सुखरूप बाहेर काढावे, अशी मागणी केली आहे. या प्रकरणामुळे अहिल्यानगरातील निवडणूक वातावरण अधिक तंग झाले असून, राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!