Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Karnataka Accident: कर्नाटकमध्ये बस आणि कंटेनरचा भीषण अपघात, 17 जणांचा जागीच मृत्यू; 21 प्रवासी जखमी

Karnataka Accident: कर्नाटकमध्ये बस आणि कंटेनरचा भीषण अपघात, 17 जणांचा जागीच मृत्यू; 21 प्रवासी जखमी

Karnataka Chitradurga bus and container terrible accident 17 died 21 injured: कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे मोठा रस्ता अपघात झाला आहे. बंगळूरुहून शिमोगामार्गे गोकर्णला जाणार्‍या एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. हिरियूर तालुक्यात गोरलाथूजवळ हा अपघात झाला, त्यानंतर बसला भीषण आग लागली. हा अपघात एका कंटेनर आणि बसच्या धडकेने झाला. अपघातात कंटेनर चालकासह 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी गुरुवारी सांगितले की चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूर तालुक्यात गोरलाथू क्रॉसजवळ राष्ट्रीय महामार्ग 48 वर झालेल्या रस्ता अपघातात कमीत कमी 17 लोकांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. हा अपघात एका प्रायव्हेट स्लीपर कोच बस आणि लॉरीच्या धडकेनंतर बसला आग लागल्याने झाला.

कसा झाला हा अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, हिरियूरहून बंगळूरुला जाणारी एक कंटेनर सेंट्रल डिव्हायडर तोडून समोरून येणाऱ्या बसला धडकला, ही बस बंगळूरुहून शिवमोग्गाला जात होती. धडक इतकी जोरदार होती की, स्लीपर कोचमध्ये महामार्गाच्या मधोमध आग लागली. या आघीत अनेक प्रवासी आतमध्येच अडकले. पोलिसांनी सांगितले की, ऑडिटनंतर मृतांचा अधिकृत आकडा मिळेल. जे लोक बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, त्यापैकी अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कंटेनर चालकाचा निष्काळजीपणा…’

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात कंटेनर चालकाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. धडक इतकी जोरदार होती आणि त्यानंतर आग लागल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली. यामुळे घटनास्थळावरील बचावकार्य अधिक कठीण झाले. त्याचबरोबर वाहतूकही विस्कळीत झाली.

अनेक तास वाहतूक विस्कळीत

चित्रदुर्गचे पोलीस अधीक्षक रंजीत यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासकार्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हिरियूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग 48 च्या व्यस्त भागावर अनेक तास वाहतूक विस्कळीत झाली होती. कारण, इमर्जन्सी टीमने ढिगारा हटवला आणि बचाव व मदतकार्य सुरू केले, त्यानंतर काहीसा दिलासा मिळाला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!