Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ठाकरे बंधूंच्या युतीला ब्रेक लागणार? देवेंद्र फडणवीसांनी गेम फिरवला, राज ठाकरेंसोबत ताज लँड्स हॉटेलमध्ये भेट!

ठाकरे बंधूंच्या युतीला ब्रेक लागणार? देवेंद्र फडणवीसांनी गेम फिरवला, राज ठाकरेंसोबत ताज लँड्स हॉटेलमध्ये भेट!

मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यामुळे शिवसेना आणि मनसेची युती होणार, या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना-मनसे युतीला ब्रेक लावण्याची शक्यता आहे. मुंबईत आज (12 जून) सकाळी एका हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती पुढे येत आहे. वांद्रे येथील ताज लँडस् हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती मिळत आहे.

आज सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे ताज लँडस हॉटेलमध्ये पोहोचले. त्यानंतर अवघ्या 20 मिनिटांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या हॉटेलमध्ये आले. सुरुवातीला हे दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये एकत्र येणे केवळ एक योगायोग आहे का, अशी चर्चा सुरु होती. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुरुवारच्या नियोजित कार्यक्रमात कुठेही ताज लँडस हॉटेलचा समावेश नव्हता. मात्र, राज ठाकरे या हॉटेलमध्ये आल्यानंतरच फडणवीस याठिकाणी का पोहोचले? असा प्रश्न आता विचारला जात आहे. फडणवीस आणि ठाकरे यांची ही भेट निर्णायक ठरणार का? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!