Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठी बातमी! एकनाथ खडसेंना न्यायालयाचा दणका; ‘या’ प्रकरणात पती-पत्नीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

मोठी बातमी! एकनाथ खडसेंना न्यायालयाचा दणका; ‘या’ प्रकरणात पती-पत्नीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

Eknath Khadse : पुण्यातील बहुचर्चित भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. सुनावणीसाठी सतत गैरहजर राहिल्याची गंभीर दखल घेत मुंबईतील विशेष ‘एमपी-एमएलए’ न्यायालयाने या दाम्पत्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट (Non-Bailable Warrant) जारी केले आहे.

नेमकी कारवाई का झाली?
शुक्रवारी (६ फेब्रुवारी) मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात या खटल्याची महत्त्वाची सुनावणी होती. यावेळी खडसे यांच्यावर आरोप निश्चित (Framing of Charges) केले जाणार होते. मात्र, एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी न्यायालयात उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने कडक पाऊल उचलले आहे.

भोसरी जमीन घोटाळ्याचे स्वरूप
महसूल मंत्री असताना आपल्या पदाचा दुरुपयोग करून भोसरी येथील एमआयडीसीची जमीन कमी किमतीत नातेवाईकांच्या नावे खरेदी केल्याचा आणि मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) या प्रकरणी १,००० पानांचे आरोपपत्र दाखल केले असून, खडसे यांचे जावई गिरीश चौधरी सध्या याच प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. यापूर्वी उच्च न्यायालयाने या खटल्याला स्थगिती देण्यास नकार दिला होता, तर विशेष न्यायालयाने खडसेंचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला आहे.

पुढील सुनावणी १३ फेब्रुवारीला
अजामीनपात्र वॉरंट निघाल्यामुळे खडसे कुटुंबापुढील कायदेशीर पेच वाढला आहे. आता १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीला एकनाथ खडसे यांना न्यायालयात हजर राहावेच लागणार आहे. अन्यथा, त्यांना अटकेसारख्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. ऐन राजकीय धामधुमीत झालेल्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!