Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मंत्री गिरीश महाजनांकडून खडसेंविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

मंत्री गिरीश महाजनांकडून खडसेंविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

मुंबई: राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांचे राज्यात कार्यरत असलेल्या एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांना महाजन यांनी आपल्या वकिलामार्फत अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. सोबतच खडसे यांनी ज्या पत्रकाराचा हवाला देऊन हे वक्तव्य केले होते, ते पत्रकार अनिल थत्ते यांनाही नोटीस पाठवली असल्याची माहिती खुद्द मंत्री महाजन यांनीच पत्रकारांना दिली.

पत्रकार थत्ते यांनी काही दिवसांपूर्वी यूट्यूबवर अपलोड केलेल्या एका व्हिडीओत मंत्री गिरीश महाजन यांच्यासंदर्भात एक दावा केला होता. महाजन यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचा सीडीआर दाखवत रात्री अपरात्री महिला अधिकाऱ्यांशी सातत्याने का बोलत असता? असा जाब विचारल्याचा दावा थत्ते यांनी आपल्या व्हिडीओतून केला होता. त्याचाच आधार घेत एकनाथ खडसे यांनी महाजनांना लक्ष्य केले होते. एका महिला आयएएस अधिकाऱ्याला रात्री दीड-दोन वाजता महाजन यांनी १०० वेळा कॉल केल्याचा दावा खडसेंनी केला होता. यानंतर महाजन खडसे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. अखेर महाजन यांनी आपली बदनामी झाल्याचे सांगत आपल्या वकिलामार्फत खडसे यांच्यासह पत्रकार अनिल थत्ते यांना नोटीस बजावली आहे.

कोणतेही सबळ पुरावे न देता पत्रकार अनिल थत्ते आणि एकनाथ खडसे यांनी आपल्यावर आरोप केले. जनमानसात आपली प्रतिमा मलीन केली आहे. याप्रकरणी आपण आता कोर्टातच लढणार असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. दुसरीकडे आपल्याला कोणत्याही प्रकारची नोटीस मिळाली नसल्याचे खडसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!