Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बीडमधील राजकीय गणित बिघडणार? ‘हा’ बडा नेता सोडणार शरद पवारांची साथ

बीडमधील राजकीय गणित बिघडणार? ‘हा’ बडा नेता सोडणार शरद पवारांची साथ

बीड: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांनी तयारीचा बिगुल वाजवला असून, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये रणनीती आखण्याचे सत्र सुरू झाले आहे. काही जिल्ह्यांमध्ये या निवडणुका आघाडी स्वरूपात लढवल्या जाण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी पक्ष स्वबळावर रिंगणात उतरण्याचा विचार करत आहेत.

या पार्श्वभूमीवर पक्षांतरांच्या हालचालींनाही गती मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला लागलेली गळती अजूनही थांबलेली नाही. ठाकरे गटातील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक नेते शिंदे गटात किंवा भाजपात दाखल झाले आहेत. आता आणखी एक मोठा धक्का राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. पक्षप्रवेशाचा मुहूर्त लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार? सुप्रिया सुळेंचा प्रस्ताव; राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा दावा

बीड जिल्हा आणि मराठवाडा विभागातील राजकीय परिस्थिती सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा रंग घेत आहे. हैदराबाद गॅझेटच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांवर जातीय समीकरणांचा परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत जयदत्त क्षीरसागर यांसारख्या प्रभावी ओबीसी नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश हा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा राजकीय फायदा ठरू शकतो. दरम्यान, कोल्हापूरच्या चंदगड नगर पंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने युती केल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील इतर ठिकाणीही अशी युती होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!