Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ताम्हिणी घाटात दरड कोसळली! कारच्या सनरुफमधून दगड डोक्यात पडल्याने महिलेचा जागीचं मृत्यू

ताम्हिणी घाटात दरड कोसळली! कारच्या सनरुफमधून दगड डोक्यात पडल्याने महिलेचा जागीचं मृत्यू

Raigad Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाट परिसरात गुरुवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पुण्यावरून माणगावच्या दिशेने प्रवास करणाऱ्या एका कारवर अचानक डोंगरावरून मोठा दगड कोसळला. या घटनेत ४३ वर्षीय स्नेहल गुजराथी या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

चालत्या कारवर कोसळला दगड

ताम्हिणी घाटातील कोंडीथर गावाच्या हद्दीत आज सकाळी हा अपघात झाला. मुसळधार पावसामुळे डोंगरातील माती दगड सैल झाले होते. त्याच दरम्यान, घाटातून एक अलिशान कार जात असताना अचानक डोंगरावरून मोठा दगड वेगाने खाली आला आणि थेट कारच्या सनरुफवर (Sunroof) आदळला. दगडाचा वेग इतका होता की तो सनरुफ फोडून आतमध्ये शिरला आणि कारमध्ये पुढील बाजूस बसलेल्या स्नेहल गुजराथी यांच्या डोक्यावर आदळला. या धडकेत त्यांना गंभीर दुखापत झाली.

हेही वाचा –फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; हॉटेच्या रूममधलं CCTV फुटेज पोलिसांच्या हाती

उपचाराआधीच मृत्यू

अपघातानंतर तात्काळ स्नेहल गुजराथी यांना जवळच्या मोदी क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे त्यांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला. स्नेहल गुजराथी या आपल्या कुटुंबासह पुण्यावरून माणगावकडे प्रवास करत होत्या. गेल्या काही दिवसांपासून ताम्हिणी घाट परिसरात जोरदार पावसाचा जोर सुरू आहे. त्यामुळे दरडीचा भाग सैल झाल्याने डोंगरावरील दगड आणि गोटे रस्त्यावर येऊ लागले आहेत. प्रशासनाने काही ठिकाणी वाहतुकीसाठी सतर्कतेचा इशारा दिला होता.

स्थानिक प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

या घटनेनंतर पोलिसांनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) ताम्हिणी घाटातील दरडीधोक्याच्या भागात वाहतूक काळजीपूर्वक करण्याचे आवाहन केले आहे. पर्यटक आणि वाहनचालकांना पावसाळ्यात या घाटात प्रवास करताना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!