Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

भयंकर बस अपघात! ओव्हरटेकच्या प्रयत्नात ५० प्रवाशांसह बस दरीत कोसळली; ३ जणांचा मृत्यू

भयंकर बस अपघात! ओव्हरटेकच्या प्रयत्नात ५० प्रवाशांसह बस दरीत कोसळली; ३ जणांचा मृत्यू

Madhya Pradesh Accident : मध्य प्रदेशच्या इंदूर जिल्ह्यातील सिमरोल पोलिस ठाण्याच्या हद्दीत भेरू घाटात सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास भयावह रस्ता अपघात झाला. ओंकारेश्वरहून इंदूरकडे जाणारी प्रवासी बस भरधाव वळणावर दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती ५० फूट खोल दरीत कोसळली.

या अपघातात तिघांचा मृत्यू झाला, त्यात दोन महिलांचा समावेश आहे. अपघातावेळी बसमध्ये सुमारे ५० प्रवासी होते, ज्यात दिल्ली, उत्तर प्रदेशसह इतर शहरांहून परतणारे भाविक होते. दोन जणांनी जागीच प्राण सोडले, तर तिसरा जखमींना रुग्णालयात नेण्याच्या वेळी मृत्युमुखी पडला. ३८ हून अधिक जखमींवर उपचार सुरू असून, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बस ओंकारेश्वर दर्शनासाठी गेल्यानंतर इंदूरमार्गे परतत होती. एका धाब्यावर जेवणानंतर काही अंतरावरच घाटातील वळणावर चालकाने ओव्हरटेकचा प्रयत्न केला, ज्यामुळे बस घसरली आणि दरीत कोसळली. अपघातानंतर जोरदार किंचाळ्यांचा आवाज ऐकू आला, तर प्रवासी प्रचंड घाबरले. एका उत्तरजीवी नवल सिंह चौहान यांनी सांगितले, “बस ओंकारेश्वर सोडल्यानंतर धाब्यावर जेवण केले आणि थोड्या अंतरावरच ती दरीत कोसळली. सगळीकडे भीती आणि गोंधळ होता.”

पोलिस आणि प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये पद्माबाई (४५ वर्षे, इंदूर), अनिता बाई (४० वर्षे, इंदूर) आणि राहुल (२५ वर्षे, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. अनिता बाई ही एका पीडिताच्या सासूबाई होत्या. जखमींना खिडकीच्या काचा तोडून बसमधून बाहेर काढण्यात आले आणि इंदूरच्या एमवाय हॉस्पिटलसह इतर रुग्णालयांत दाखल करण्यात आले. यापैकी ९ जणांना एमवाय हॉस्पिटलमध्ये उपचार मिळत असून, ३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. उर्वरित ३० जणांना किरकोळ जखमांसाठी प्राथमिक उपचार दिले गेले.

सीएम यदावांची प्रतिक्रिया आणि मदत

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या अपघाताला “अत्यंत हृदयद्रावक” संबोधून मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री वित्तीय मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींना मोफत उपचार देण्याचे निर्देशही दिले. त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करून मृतांच्या आत्म्याला शांती मिळो आणि जखमींना लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!