Today गुरूवार, 6th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; हत्येसाठी 2.5 कोटींची सुपारी, माजी सहकाऱ्याचा कटात हात

मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; हत्येसाठी 2.5 कोटींची सुपारी, माजी सहकाऱ्याचा कटात हात

Manoj Jarange Patil Death Threat: मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन छेडणारे नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांनी तातडीची कारवाई करत बीड जिल्ह्यातील दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

जालना पोलिसांचा जलद सर्च ऑपरेशन

मनोज जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी या संदर्भात जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने बीड शहरात रात्री उशिरा धडक कारवाई करत दोन जणांना अटक केली. ताब्यात घेतलेल्यांची नावे दादा गरुड अमोल खुणे (जरांगे पाटलांचे माजी सहकारी) अशी आहेत. पोलिसांच्या चौकशीत एका प्रभावशाली राजकीय नेत्याने हत्येचा कट रचल्याचा आरोप उघड झाला आहे.

हत्येचा कट कसा रचला गेला?

दरम्यान, पोलीस तपासात असे समोर आले आहे की, बीडमध्ये काही गुप्त बैठकांमध्ये जरांगे पाटलांना संपवण्याची योजना आखण्यात आली होती. या बैठकींना जरांगे पाटलांच्या एका माजी सहकाऱ्यासह इतर व्यक्ती उपस्थित होते. 2.5 कोटींच्या सुपारीची डील याच बैठकीत निश्चित करण्यात आल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा –  पंकजा मुंडे वारसदार नाही तर मग कोण? मनोज जरांगे यांचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा

जरांगे पाटलांनी घेतली पोलिसांची भेट

घटनेची माहिती मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील स्वतः रात्री उशिरा जालना पोलीस अधीक्षकांना भेटले. त्यांनी पोलिसांना सखोल तपास आणि सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. सध्या पोलीस दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत असून, या कटामागील प्रमुख सूत्रधार कोण, हे शोधण्याचे प्रयत्न करत आहेत.

राज्यभरात खळबळ

मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या जरांगे पाटलांच्या हत्येचा कट उघड झाल्याने राज्य राजकारणात खळबळ उडाली आहे हा कट कोणत्या राजकीय हेतूने रचला गेला आणि आणखी कोण यामध्ये सहभागी आहेत, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे एक मोठा अनर्थ टळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर जरांगे पाटलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!