Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ATS ची कारवाई! 7 वर्षांपासून भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेला भोसरीमध्ये अटक

ATS ची कारवाई! 7 वर्षांपासून भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेला भोसरीमध्ये अटक

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) भोसरी परिसरातून गेल्या सात ते आठ वर्षांपासून भारतात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या एका बांगलादेशी महिलेला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या ३५ वर्षीय महिलेचे नाव फातिमा अमजद अख्तर असे असून, ती ‘माला विठ्ठल डावखर उर्फ फातिमा बेगम फैमुद्दीन’ या बनावट नावाने राहत होती.

व्हिसाची मुदत संपल्यानंतरही राहिली भारतात

पोलिसांच्या माहितीनुसार, फातिमा सुरुवातीला नोकरीच्या शोधात वैध व्हिसावर भारतात आली होती. मात्र व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ती देशातच राहिली. तिने खोटे नाव व ओळखपत्र वापरून भोसरीत वास्तव्य केले आणि घरगुती मदतनीस म्हणून काम केले.

कर्नाटकातील व्यक्तीशी विवाह

तपासात असे उघड झाले की फातिमाने कर्नाटकातील एका पुरुषाशी विवाह केला होता. ती त्याच्यासोबत भोसरीत राहत होती आणि पतीला तिच्या बांगलादेशी नागरिकत्वाबद्दल माहिती होती.

एटीएसची कारवाई

एटीएसला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पथकाने तिला ताब्यात घेतले. सध्या पोलिसांनी तिच्या नागरिकत्वाच्या पडताळणीसाठी आणि बांगलादेशात परत पाठवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या कारवाईनंतर पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत पिंपरी-चिंचवड परिसरात १९ बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीर वास्तव्याबद्दल ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांना आणखी काही व्यक्ती अशाच पद्धतीने या भागात राहत असल्याचा संशय आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!