Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

लोणी काळभोरमध्ये कचऱ्याचा डोंगर! ठेकेदार-महापालिका अधिकाऱ्यांचे संगनमत उघड, नागरिकांचा संताप

लोणी काळभोरमध्ये कचऱ्याचा डोंगर! ठेकेदार-महापालिका अधिकाऱ्यांचे संगनमत उघड, नागरिकांचा संताप

Loni Kalbhor Garbage Scam: पुणे शहराच्या सीमेलगत असलेल्या लोणी काळभोर परिसरातील नागरिक आणि शेतकरी सध्या गंभीर पर्यावरणीय संकटाचा सामना करत आहेत. मागील सात ते आठ वर्षांपासून येथील वडाळे वस्ती परिसरात महापालिकेच्या गाड्यांतून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो आहे. शहरातील स्वच्छतेसाठी उभारलेली यंत्रणा प्रत्यक्षात ग्रामीण भाग प्रदूषित करत असल्याचे चित्र समोर आले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वन विभाग आणि महापालिकेतील काही अधिकारी ठेकेदारांशी संगनमत करून या भागात सुमारे दीड चौरस किलोमीटर परिसरात मिक्स कचऱ्याचे ढीग लावले आहेत. यातील लिचेट (द्रव विषारी द्रव्य) जवळील ओढ्यात मिसळून विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना आता पिण्यासाठी आरओ पाणी विकत घ्यावे लागत आहे.

प्रदूषणाचा फटका शेती व पशुपालनालाही

कचऱ्यामुळे या परिसरात डुकरं आणि भटकी कुत्री मोठ्या संख्येने जमा होत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. कचरा वाहतुकीमुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून, पोल्ट्री फार्मधील पक्ष्यांवरही प्रदूषणाचा परिणाम होत आहे.

कागदावर शेतकऱ्यांसाठी खत, प्रत्यक्षात बेकायदेशीर डंपिंग

महापालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या मागणीवरून ओला कचरा खतासाठी पाठविला जातो असे दाखवले जाते. परंतु, प्रत्यक्षात हा कचरा शेतकऱ्यांच्या शेतात न जाता बेकायदेशीररीत्या वडाळे वस्ती परिसरातच टाकला जातो. महापालिका ठेकेदारांना प्रति टन कचऱ्यावर 700 रुपये देत असून, या व्यवहारातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

हेही वाचा – पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! पिंपरी ते निगडी मेट्रो विस्ताराचे 35 टक्के काम पूर्ण

वन विभागाची संशयास्पद भूमिका

वन विभागाच्या हद्दीतच कचरा साठवला जात असतानाही संबंधित बीट मार्शल आणि अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे या सगळ्या कारस्थानात त्यांचेही संगनमत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लवकरच NGT कडे तक्रार; नागरिकांचा इशारा

स्थानिक ग्रामस्थ निलेश काळभोर यांनी सांगितले की, “या भागातील पाण्याचे स्रोत आणि शेती प्रदूषित झाली आहे. वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे आम्ही आता राष्ट्रीय हरित लवादाकडे (NGT) औपचारिक तक्रार दाखल करणार आहोत.”

महापालिकेकडून नुकसानभरपाईची मागणी

दरम्यान, भटकी जनावरे आणि प्रदूषणामुळे शेतीचे व घरांचे नुकसान झाल्याचे स्थानिक शुभम काळभोर यांनी सांगितले. त्यांनी मागणी केली की, महापालिकेने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी आणि परिसर पूर्णपणे स्वच्छ करावा.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!