Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Jalna Murder Case: घरातल्या घरातचं जुळलं सूत; पत्नीने दिरासोबत मिळून केली पतीची हत्या

Jalna Murder Case: घरातल्या घरातचं जुळलं सूत; पत्नीने दिरासोबत मिळून केली पतीची हत्या

Jalna Crime News: जालना जिल्ह्यातील सोमठाणा गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने तिच्या दिरासोबत कट रचून तिच्या पतीची हत्या केली. पीडित पुरुषाची ओळख परमेश्वर राम तायडे अशी करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली, जेव्हा तायडे यांचा मृतदेह सोमठाणा तलावात पोत्यात तरंगताना आढळला. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती, परंतु तपासानंतर त्याची ओळख निश्चित झाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवले. तथापी, पीडिताचे वडील राम नाथ तायडे यांनी तक्रार दाखल करून खुनाचा गुन्हा नोंदविला.

हेही वाचा – पिंपरी चिंचवड गोळीबाराने हादरले! मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; व्यवहाराच्या वादातून हत्या

पोलीसांनी तपास सुरु केला असता, पीडिताची पत्नी मनीषा आणि धाकटा भाऊ ज्ञानेश्वर यांची चौकशी सुरु केली. सुरुवातीला दोघांनी तथ्य टाळण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर त्यांनी तायडे यांची हत्या केली असल्याची कबुली दिली. तपासात समोर आले की, मनीषा आणि ज्ञानेश्वर यांच्यात गुप्त प्रेमसंबंध होते. परमेश्वर हा नात्याचा अडथळा ठरत असल्यामुळे त्यांनी त्याला मारण्याचा कट रचला. आरोपी दोघांनी तायडेच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली.

हत्या केल्यावर मृतदेहाचा तलावात फेकला

हत्या केल्यानंतर, मनीषा आणि ज्ञानेश्वर यांनी मृतदेह एका पोत्यात भरला, दोरीने बांधला आणि सोमठाणा तलावात फेकला. मृतदेह पाण्यावर तरंगू नये म्हणून त्यांनी पोत्यात दगड भरले. या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!