मुंबई : अभिनेता विवेक ओबेरॉयचा ‘मस्ती ४’ हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये येताना दिसत आहे. विवेक ओबेरॉय हा बऱ्याच वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतताना दिसत आहे. त्याच्या कारकिर्दीतील चढ-उतारांना तोंड देण्यासोबतच, विवेकने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही बरेच काही पाहिले आहे. पण त्याने कधीही हार मानली नसल्याचे दिसून आले.
विवेक ओबेरॉय हा नेहमीच पुन्हा-पुन्हा अडचणीतून बाहेर येताना दिसला. विवेकने ब्रेकअपबद्दल सांगितले. ‘ब्रेकअपनंतर मी खूप चिडचिडा झालो होतो. ती व्यक्ती तुमच्यासाठी चुकीची असू शकते. मात्र, नेहमीच कोणीतरी असेल जो तुमच्यासाठी योग्य असेल, असे नाही. कदाचित तुमचा वेळ वाईट जात असेल. ब्रेकअपनंतर मी दु:खी होतो. मला नातेसंबंध नको होते. मात्र, आता हळूहळू सर्व पूर्वपदावर येत आहे. जेव्हा तुम्ही योग्य व्यक्तीला भेटता तेव्हा तुम्हाला कळते की ते सगळं एक वाईट स्वप्न होतं. जर तुम्ही स्वतःला सकारात्मक ठेवलं तरच ब्रेकअपमधून सावरू शकता.
ब्रेक झाल्यानंतर आपण ताण घेऊ नये. आपण ती मोठी समस्या मानू नये. पण आपल्याला ते कळतं, आणि आज मला माझ्या स्वतःच्या कृतींवर हसू येतं. जेव्हा तुम्ही लहानपणी दुःखी असता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की आयुष्य संपलं. ती मला सोडून गेली. आता मी काय करू? मग, दोन वर्षांनी, तुम्ही दुसऱ्या कोणाशी तरी डेट करत आहात. तुम्ही आनंदी असता. तुम्ही लग्न करता, मुले होतात आणि आयुष्य पुढे चालू राहते. त्यामुळे जुन्या गोष्टी सोडून नव्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.


