Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

स्टीलच्या डब्यात कधीही साठवू नका ‘या’ वस्तू; हळूहळू बनू शकतं विष, काळजी घ्या…!

स्टीलच्या डब्यात कधीही साठवू नका ‘या’ वस्तू; हळूहळू बनू शकतं विष, काळजी घ्या…!

स्टीलचे डबे मजबूत आणि टिकाऊ असल्याने ते अन्न साठवण्यासाठी वर्षानुवर्षे घरांमध्ये वापरले जात आहेत. मात्र, अनेकांना हे माहीत नाही की स्टीलचे डबे प्रत्येक गोष्टीसाठी योग्य नसतात. तुम्ही स्टीलच्या डब्यात सर्वकाही साठवू शकत नाही. विशेषतः काही पदार्थ जे त्यात साठवल्यास खराब होऊ शकतात.

काही पदार्थ आहेत जे स्टीलच्या डब्यात साठवल्यावर रासायनिक प्रतिक्रिया देऊ शकतात, ज्यामुळे चव बदलू शकते आणि आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. दही ठेवणे टाळा. दह्यात आम्ल असते. स्टीलच्या डब्यात जास्त काळ साठवल्यास ते लवकर खराब होऊ शकते आणि त्याची चव देखील बदलू शकते. काचेच्या, प्लास्टिकच्या किंवा मातीच्या डब्यात दही साठवणे नेहमीच चांगले. तसेच जर टरबूज, पपई, सफरचंद किंवा संत्री यांसारखी कापलेली फळे स्टीलमध्ये साठवली तर त्यांचा रंग आणि चव बदलू शकते. म्हणून, फळे नेहमी प्लास्टिक, काच किंवा मातीच्या डब्यात साठवा.

याशिवाय, टोमॅटो ठेवू नका. टोमॅटोमध्ये आम्ल जास्त असते. स्टीलच्या डब्यात टोमॅटोची चटणी, सूप किंवा पास्ता सॉस साठवल्याने त्यांची चव आंबट होऊ शकते. शिवाय, त्यांचा रंग बदलू शकतो. अशा पदार्थांसाठी काचेचे किंवा सिरॅमिकचे डबे हे सुरक्षित पर्याय आहेत. लोणचे ठेवणे टाळा. लोणच्यामध्ये भरपूर मीठ आणि व्हिनेगर असते. यामुळे लोणच्याची चव बदलू शकते आणि कधीकधी थोडीशी धातूची चव येऊ शकते. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्या.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!