Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Swaraj Kaushal Death: माजी परराष्ट्र मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांचे निधन

Swaraj Kaushal Death: माजी परराष्ट्र मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांचे निधन

Swaraj Kaushal Death: माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे पती आणि भाजप खासदार बांसुरी स्वराज यांचे वडील स्वराज कौशल यांचे गुरुवारी (४ डिसेंबर) वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. दिल्ली भाजपने अधिकृतरित्या सांगितले की त्यांचे अंत्यसंस्कार गुरुवारी लोधी रोड स्मशानभूमीत पार पडतील. स्वराज कौशल हे मिझोरामचे माजी राज्यपाल आणि देशातील वरिष्ठ विधिज्ञ म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनानंतर राजकीय तसेच कायदा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर शोक व्यक्त केला जात आहे.

राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करत म्हटले की, मिझोरामचे माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ वकील श्री. स्वराज कौशल यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. सार्वजनिक जीवनातील त्यांचे योगदान नेहमी स्मरणात राहील. या कठीण काळात खासदार बांसुरी स्वराज आणि त्यांच्या कुटुंबियांस माझ्या मनापासून संवेदना आहेत.

हेही वाचा – राज्यातील भाजपच्या सर्व खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; महत्वांच्या विषयांवर झाली चर्चा

बांसुरी स्वराज यांची भावनिक प्रतिक्रिया

आपल्या वडिलांच्या निधनानंतर बांसुरी स्वराज यांनी X (पूर्वीचा ट्विटर) वर भावूक संदेश शेअर केला. त्यांनी म्हटलं की, ‘पापा… तुमचे प्रेम, शिस्त, साधेपणा आणि देशभक्ती हा माझ्या जीवनाचा दीपस्तंभ आहे. तुम्ही आम्हाला सोडून गेलात ही वेदना असह्य आहे, पण तुमचा वारसा आणि मूल्ये माझ्या प्रत्येक पावलाला मार्गदर्शन करतील. ओम शांती.’ राजकीय आणि कायदा क्षेत्रातील नेत्यांकडून त्यांच्या निधनावर श्रद्धांजली आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!