Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राज्यातील भाजपच्या सर्व खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; महत्वांच्या विषयांवर झाली चर्चा

राज्यातील भाजपच्या सर्व खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; महत्वांच्या विषयांवर झाली चर्चा

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील भाजप खासदारांची आज सकाळी 10 वाजता केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत बैठक झाली त्यानंतर 10 वाजून 25 मिनिटांनी सर्व खासदार पंतप्रधानांच्या दालनात दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठक पार पडली. संसदीय कामातील सहभाग आणि राजकीय परिस्थितीवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. काल संसदेत गणपूर्ती झाली नव्हती त्यामुळे बेल वाजली. तर लोकसभेचा कोरम पूर्ण झाला नाही हे सरकराचे अपयश समजले जाते, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वरीष्ठ मंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली होती.

बैठकीत कशावर झाली चर्चा
महाराष्ट्रातील खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी लोकसभा आणि राज्यसभेमधील भाजपचे खासदार उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी संसदीय कामकाज यातील सहभाग आणि सरकारची प्रतिमा, खासदार करत असलेली काम याबाबतची चर्चा केली, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी त्यांची मत देखील जाणून घेतली. त्याचबरोबर संसदीय कामकाजात सहभाग घेणे, सक्रिय सहभाग नोंदवणे, याबाबत सर्व खासदारांचा मत लक्षात घेण्यात आलं. सकाळी दहा वाजता पहिल्यांदा पियुष गोयल यांच्या दालनामध्ये सर्व खासदार एकत्रित जमले होते, तिथून पुढे हे सर्व खासदार दहा वाजून 25 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात पोहोचले.

काल गणपूर्ती होऊ शकलेली नव्हती, लोकसभेचे कोरम पूर्ण झालेला नव्हता, त्यामुळे बेल वाजली. जेव्हा लोकसभेमध्ये कोरम पूर्ण होत नाही बेल वाजवावी लागते, तर हे सरकारी पक्षाचं अपयश समजलं जातं, लोकसभेच्या सभागृहात किमान 50 खासदार तरी कामकाजासाठी उपस्थित असावे लागतात, आणि काल भाजपाचे खासदार आणि सत्ताधारी पक्षांचे खासदार खूप कमी संख्येने उपस्थित होते, त्यामुळे कोरम पूर्ण झाला नाही. या सर्व बाबतीत एक व्यवस्थित फ्लोअर मॅनेजमेंट असला पाहिजे, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वरिष्ठमंत्र्यांकडे नाराजी देखील व्यक्त केली अशी माहिती समोर आली आहे, त्याचबरोबर नरेंद्र मोदी हे इतर राज्यातील खासदारांची अशाच प्रकारे संवाद साधणार असल्याचं आणि भेटणार असल्याची माहिती आहे.

कोणकोणते खासदार उपस्थित
राज्यसभेतून धनंजय महाडीक,अनिल बोंडे, भागवत कराड,अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, धैर्यशील पाटील, उज्ज्वल निकम तर लोकसभेतून नितीन गडकरी, नारायण राणे, मुरलीधर मोहोळ, हेमंत सावरा, अनुप धोत्रे, स्मिता वाघ, पियुष गोयल उपस्थित होते. पंतप्रधानांच्या बैठकीपूर्वी पियुष गोयल यांच्या कार्यालयात महाराष्ट्रातील भाजप खासदारांची बैठक पार पडली आहे. त्यानंतर पियुष गोयल यांच्यासोबत सर्व खासदार पंतप्रधान मोदींच्या भेटीला दाखल झाले होते.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!