Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

साधू-संतांना तरी झाडांची कत्तल केलेली पटेल का? सयाजी शिंदेंचा सरकारला संतप्त सवाल

साधू-संतांना तरी झाडांची कत्तल केलेली पटेल का? सयाजी शिंदेंचा सरकारला संतप्त सवाल

Sayaji Shinde On Tapovan Tree Cutting: नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरातील साधुग्रामच्या जागेवर सुरू असलेल्या वृक्षतोडीवर पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी आणि राजकीय नेते एकत्र उभे झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अभिनेता आणि वृक्षमित्र सजाजी शिंदे यांनीही आपली स्पष्ट भूमिका मांडली असून, ‘ज्यांच्यासाठी झाडे तोडली जात आहेत, त्या साधु-संतांना तरी झाडं तोडलेलं पटेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

झाडं तोडून दुसरी झाडे लावणे ही कल्पना चुकीची

दरम्यान, तपोवनातील 1,150 एकरांवर साधु-महंतांसाठी भव्य साधूग्राम उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून, या कामासाठी जवळपास 1,800 झाडे तोडली जात आहेत. यामुळे वृक्षप्रेमी आणि पर्यावरणवाद्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया निर्माण झाली आहे. सजाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, 10 वर्षांच्या आतची झाडे तोडणे आणि त्याऐवजी दुसरी झाडे लावणे ही कल्पना चुकीची आहे. आपण जगतो ते फक्त झाडांमुळे जगतो. जर आपल्या आई-बापांवर हल्ला केला जात असेल तर आपण गप्प बसणार आहोत का? असा प्रश्नही शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा – तपोवनातील वृक्षतोडीबाबत सयाजी शिंदेंनी घेतलेली भूमिका हिताची; अजित पवारांच्या भूमिकेमुळे वाढली महायुतीची डोकेदुखी

या निषेधात शनिवारी, 6 डिसेंबर रोजी सकाळी मनसेकडून जाहीर निषेध नोंदवण्यात येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी संघ आणि अनेक कलाकार या निषेधात सहभागी होणार असून, सर्व वृक्षप्रेमींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सजाजी शिंदे यांनी आपल्या वक्तव्यांमध्ये म्हटले की, झाडं फक्त पर्यावरणाचे स्रोत नाहीत, तर ते आपले पालक आहेत. कोणत्याही साधु-संतांचा अपमान न करता झाडं तोडणे कुणालाही स्वीकार्य ठरणार नाही. त्यांनी ठामपणे सांगितले की झाडांचे संरक्षण करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि या वृक्षतोडीवर सर्वांनी सक्रियपणे विरोध नोंदवावा.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!