Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Indigo Flight Cancellation: इंडिगोवर कारवाई करा! सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारकडे मागणी

Indigo Flight Cancellation: इंडिगोवर कारवाई करा! सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारकडे मागणी

Indigo Flight Cancellation: देशातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या इंडिगोमध्ये गेल्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले असून, तब्बल 1,000 पेक्षा जास्त उड्डाणे अचानक रद्द करण्यात आली आहेत. या गोंधळामुळे मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळूरू, अहमदाबादसह अनेक प्रमुख विमानतळांवर हजारो प्रवासी अडकून पडले. वाढलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर कंपनीचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली.

सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारकडे कारवाईची मागणी

या घटनाक्रमावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. दोन दिवसांपासून हजारो लोकांची गैरसोय होत असताना केंद्र सरकार शांत कसे राहू शकते? इंडिगोवर तातडीने कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी थेट संसदेत याबाबत सरकारकडून स्पष्टीकरणही मागितले.

हेही वाचा –जय पवारांच्या लग्नात अजित दादांचा डान्स; रोहित अन् युगेंद्र पवार…, सुप्रिया सुळेंनी शेअर केले खास क्षण

पूर्वसूचना न देता एवढा मोठा गोंधळ कसा?

इंडिगोसारख्या मोठ्या विमान कंपनीकडून अशी बेफिकिरी अपेक्षित नव्हती. कोणतीही पूर्वसूचना नाही, नियोजन नाही, आणि प्रवाशांचा लाखोंचा तोटा सहन करावा लागत आहे, असे म्हणत सुळेंनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, देशात इंडिगोसारख्या किमान पाच पर्यायी कंपन्या उभ्या केल्यास स्पर्धा निर्माण होईल आणि अशा परिस्थितीला आळा बसेल, असेही त्यांनी सुचवले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!