Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Leopard Attack: दिलासादायक! आता बिबट्याच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना मिळणार नोकरी?

Leopard Attack: दिलासादायक! आता बिबट्याच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना मिळणार नोकरी?

Leopard Attack: गेल्या काही दिवसांपासून राज्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा दुर्दैवी घटनांमुळे कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला गमावलेल्या घरांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होत आहे. या गंभीर प्रश्नावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासन आता एका महत्त्वाच्या प्रस्तावावर गंभीरपणे विचार करत आहे. हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना वन विभागात सरकारी नोकरी देण्याच्या प्रस्वावर चर्चा सुरू असल्याचं वृत्त आहे. वन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवी जीवितहानीचा वाढता आलेख लक्षात घेऊन राज्य सरकार यावर लवकरचं निर्णय घेण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – ओतूर येथे बिबट्याचा थरार! शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या तत्परतेने बचाव

आर्थिक दिलासा देण्यासाठी नोकरीचा प्रस्ताव

कुटुंबातील आधारस्तंभ गमावल्यामुळे संबंधित कुटुंबांवर डोंगराएवढा आर्थिक भार येतो. मुलांचे शिक्षण, घराचा खर्च, शेती आणि कर्जाची जबाबदारी पेलणे त्यांना कठीण होते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या दिली जाणारी आर्थिक मदत दीर्घकाळ पुरेशी नसते. त्याऐवजी, सरकारी नोकरी हा त्या कुटुंबाला कायमस्वरूपी आणि मोठा दिलासा देणारा उपाय ठरू शकतो. यामुळे आर्थिक वाताहत थांबेल आणि कुटुंबाला पुन्हा उभे राहण्यास मदत मिळेल. शासनाकडून लवकरच या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – Leopard Attack: अंधारात फोनवर बोलणं पडलं महागात! नारायणगावमध्ये 18 वर्षांच्या तरुणावर बिबट्याचा अचानक हल्ला

बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे स्थानिक नागरिक धास्तावले –

राज्याच्या विविध भागांत बिबट्या आणि वाघांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील रेनाखळी परिसरात बिबट्याने दोन जनावरांना ठार केलं. वन विभागाने ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये बिबट्या आढळल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि जनावरे घरामध्ये बांधण्याचे आवाहन केले आहे. तथापी, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवेल आणि कोंडायबारी भागात बिबट्याचा मुक्त संचार आढळून आला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!