मुंबई : ‘अंगूरी भाभी’ अर्थात टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदे ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘भाभी जी घर है’च्या निर्मात्यांशी तिचा वाद आता संपला आहे. चाहत्यांना शिल्पाचा शोमधील २.० व्हर्जन खूप आवडला आहे. टीव्ही शोमध्ये काम करण्यासाठी अभिनेत्रीला पुन्हा शहरी जीवनाशी जुळवून घ्यावे लागत आहे.
शिल्पा शिंदे ही ग्लॅमर जगताच्या धावपळीपासून दूर महाराष्ट्रातील कर्जतमध्ये साधे जीवन जगत होती. शिल्पा शुटिंगसाठी मुंबईत परतली आहे. एका मुलाखतीत तिने शहरी जीवनाशी कसे जुळवून घेत आहे हे सांगितले. शिल्पाची मुंबईत कोणतीही मालमत्ता नाही. ती शहरात भाड्याने राहते. शहरातील जीवनाशी पुन्हा जुळवून घेणे कठीण होत चालले आहे. तिने लगेचच शोमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. दोनदा विचार न करता होकार दिल्याचे तिने सांगितले.
जेव्हा आसिफजींनी फोन केला आणि सांगितले, ‘शोमध्ये पुन्हा या. सगळेच तुम्हाला मिस करत आहेत. तेव्हा मी होकार दिला. मी दोनदा विचार केला नाही. पण नंतर, मला जाणवले की मला काही गोष्टी सांभाळाव्या लागतील. कारण मी हे मनोरंजन विश्व सोडून गेले होते. त्यामुळे आता ते थोडे आव्हानात्मक बनत होते आणि अद्यापही बनत आहे. शहर गोंगाट आणि गर्दीचे आहे. मुंबईत परतल्यानंतर काही दिवस मला विचित्र वाटले. मला गुदमरल्यासारखे वाटले. पण आता कसंतरी सांभाळत आहे’, असे शिल्पाने म्हटले आहे.


