Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Amaravati Politics : मतदानाच्या तोंडावर भाजप ‘ॲक्शन मोड’वर; १५ पदाधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन, नेमकं कारण काय?

Amaravati Politics : मतदानाच्या तोंडावर भाजप ‘ॲक्शन मोड’वर; १५ पदाधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन, नेमकं कारण काय?

Amaravati Politics : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत अमरावतीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असतानाच भाजपने कठोर पाऊल उचलत अमरावती शहरातील १५ पदाधिकाऱ्यांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

अमरावती महानगरपालिका निवडणुकीदरम्यान पक्षशिस्त भंग आणि पक्षविरोधी कारवायांचे आरोप ठेवत भाजपचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी ही कारवाई केली आहे. निलंबित पदाधिकाऱ्यांवर अधिकृत भाजप उमेदवारांविरोधात उघड बंडखोरी, पक्षाच्या निर्णयांना विरोध आणि अपप्रचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

या पदाधिकाऱ्यांच्या कृतीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असून संघटनात्मक शिस्त धोक्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना पदांवरून तसेच प्राथमिक सदस्यत्वावरून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. भाजप पक्षात शिस्त अत्यंत महत्त्वाची असून पक्षविरोधी कारवाया कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसांत आणखी काही पदाधिकाऱ्यांवरही अशीच कठोर कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहिती शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी दिली आहे. मतदानापूर्वी भाजपने उचललेल्या या पावलामुळे अमरावतीतील राजकारण चांगलेच तापले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!