Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sambhajinagar Crime: शेताची पाहणी करण्यासाठी गेला पण परतलाचं नाही…माजी सरपंचाच्या मुलासोबत भयंकर घडलं

Sambhajinagar Crime: शेताची पाहणी करण्यासाठी गेला पण परतलाचं नाही…माजी सरपंचाच्या मुलासोबत भयंकर घडलं

Sambhajinagar Crime: औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या जामडी (फॉरेस्ट) परिसरात मंगळवारी एक खळबळजनक घटना घडली. माजी सरपंचाचे चिरंजीव राजू रामचंद्र पवार (४५) यांची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून निघृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, राजू पवार हे मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे आपल्या शेताची पाहणी करण्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र, दुपारी उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांची धाकधूक वाढली. त्यांच्या मोबाईलवर वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामस्थांच्या मदतीने शोध सुरू झाला. अखेर दुपारी १२:३० च्या सुमारास वनविभागाच्या गट क्रमांक ९५ मधील जमिनीत त्यांचा मृतदेह आढळून आला. हल्लेखोरांनी राजू पवार यांच्यावर अत्यंत निर्घृणपणे हल्ला चढवला होता. त्यांच्या डोक्यावर आणि गुप्तांगावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

तपासासाठी यंत्रणा सज्ज

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री आणि सहायक पोलीस निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून छत्रपती संभाजीनगर येथून श्वानपथक, ठसेतज्ज्ञ आणि फॉरेन्सिक व्हॅनला पाचारण करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही आरोपींचा शोध घेत आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही.

राजकीय वैमनस्याचा संशय?

पवार कुटुंब स्थानिक राजकारणात मोठे प्रस्थ आहे. राजू यांचे वडील रामचंद्र पवार हे माजी सरपंच आहेत, तर सध्या त्यांच्या काकू रेणुका पवार गावच्या सरपंच आहेत. सरपंच असलेल्या काकूंच्या प्रशासकीय कामाची जबाबदारी राजू हेच सांभाळत असत. त्यामुळे ही हत्या राजकीय वादातून झाली की यामागे काही वैयक्तिक कारण आहे, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. राजू पवार यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जामडी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, बुधवारी मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!