Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

खंबाटकी घाटाचा ‘S’ वळणाचा फेरा संपणार! पुणे-सातारा प्रवास आता सुसाट होणार; 45 मिनिटांचे अंतर 7 मिनिटांत पार करता येणार

खंबाटकी घाटाचा ‘S’ वळणाचा फेरा संपणार! पुणे-सातारा प्रवास आता सुसाट होणार; 45 मिनिटांचे अंतर 7 मिनिटांत पार करता येणार

Khambatki Ghat Tunnel: पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. प्रवाशांच्या जिवावर बेतणारे खंबाटकी घाटातील धोकादायक ‘S’ आकाराचे वळण आता इतिहास जमा होणार आहे. या घाटातील वाहतूक कोंडी आणि अपघातांवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून उभारण्यात आलेल्या दोन नव्या दुहेरी बोगद्यांपैकी एका बाजूच्या बोगद्याची चाचणी यशस्वी झाली असून, तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

खासदार मुरलीधर मोहोळ यांची मोठी घोषणा

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत माहिती देताना सांगितले की, खंबाटकी घाटातील नव्या बोगद्याच्या डाव्या बाजूची मार्गिका चाचणी तत्त्वावर सुरू झाली आहे. यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे. जिथे घाट पार करण्यासाठी पूर्वी ४५ मिनिटे लागायची, तिथे आता अवघ्या ७ मिनिटांत हा टप्पा पार करता येईल.

हेही वाचा – Pune-Solapur Highway: पुणे-सोलापूर हायवेवर गाड्या धावणार सुसाट! स्थानिक वाहतुकीसाठी सरकारने तयार केला ‘हा’ खास प्लॅन

प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि सद्यस्थिती

  • बोगद्याची लांबी: हा बोगदा १.३ किमी लांबीचा असून, सोबतीला १.२ किमी लांबीचा भव्य व्हायाडक्ट (उड्डाणपूल) उभारण्यात आला आहे.
  • तीन पदरी मार्ग: हे दोन्ही बोगदे तीन पदरी (3-Lane) असून, त्यामुळे मोठ्या वाहनांनाही विनाअडथळा प्रवास करता येईल.
  • कामाची प्रगती: प्रकल्पाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. डाव्या बाजूचा बोगदा सुरू झाला असून, उजव्या बाजूची ट्यूब जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

अपघातांचे सावट दूर होणार
खंबाटकी घाटातील ‘एस’ आकाराचे वळण अत्यंत धोकादायक मानले जाते. या ठिकाणी भीषण अपघातांचे प्रमाण मोठे होते आणि वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे तासनतास वाया जात होते. नव्या बोगद्यामुळे हा घाट मार्ग पूर्णपणे वगळला जाणार असल्याने प्रवास केवळ वेगवानच नाही, तर सुरक्षितही होणार आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू झालेले हे काम कोरोना संकटामुळे लांबणीवर पडले होते, मात्र आता ते अंतिम टप्प्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!