Today शुक्रवार, 31st जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नाशिक हादरलं! तळहातावर ‘I Love You…’ शेवटचा निरोप लिहून 21 वर्षीय तरुणीने जीवनयात्रा संपवली

नाशिक हादरलं! तळहातावर ‘I Love You…’ शेवटचा निरोप लिहून 21 वर्षीय तरुणीने जीवनयात्रा संपवली

Nashik Crime: गंगापूर रोडवरील ध्रुवनगर परिसरात एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका २१ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या तळहातावर आई-वडिलांसाठी लिहिलेला भावूक संदेश वाचून उपस्थितांचे डोळे पाणावले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

तळहातावरील तो संदेश ठरला शेवटचा!

दीक्षा दत्तू त्रिभूवन (वय 21) असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. रविवारी (18 जानेवारी) सायंकाळी 6 च्या सुमारास, घरात कोणीही नसताना दीक्षाने टोकाचे पाऊल उचलले. गळफास घेण्यापूर्वी तिने आपल्या हातावर ‘आय लव्ह यू मॉम-डॅड’ असा हृदयस्पर्शी मेसेज लिहिला होता. कुटुंबीयांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तातडीने तिला रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

हेही वाचा – धक्कादायक! संविधान विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता पवारची आत्महत्या; जामिनावर सुटून घरी आल्यानंतर टोकाचं पाऊल

अभ्यासू आणि शांत स्वभावाची दीक्षा

गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षा ही दिव्यांग होती. शारीरिक मर्यादा असूनही ती अभ्यासात अत्यंत हुशार आणि स्वभावाने अतिशय संयमी होती. तिच्या अशा अनपेक्षित जाण्याने त्रिभूवन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दीक्षाने इतके मोठे पाऊल का उचलले? तिच्यावर काही शैक्षणिक किंवा मानसिक दडपण होते का? याचा शोध पोलीस घेत आहेत. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. ध्रुवनगरमधील एका शांत आणि प्रेमळ मुलीने अशा प्रकारे जगाचा निरोप घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!