Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Paro Pinaki Ki Kahani: दुर्लक्षित घटकाची आर्त प्रेमकथा; अभय बलकवडे यांचा ‘पारो पिनाकी की कहानी’ चित्रपट पुण्यात प्रदर्शित

Paro Pinaki Ki Kahani: दुर्लक्षित घटकाची आर्त प्रेमकथा; अभय बलकवडे यांचा ‘पारो पिनाकी की कहानी’ चित्रपट पुण्यात प्रदर्शित

Paro Pinaki Ki Kahani : युवा चित्रपट निर्माते आणि प्रसिद्ध छायाचित्रकार अभय बलकवडे यांचा “पारो पिनाकी की कहानी” हा चित्रपट नुकताच पुण्यात प्रदर्शित झाला आहे. सामाजिक आशयाने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच पुणेकर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एका संवेदनशील विषयाला कलात्मक स्पर्श देऊन समाजातील एका दुर्लक्षित घटकाचे वास्तव या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर मांडण्यात आले आहे.

भाजी विक्रेती आणि सफाई कामगाराची हृदयस्पर्शी कथा
या चित्रपटाची कथा एका सफाई कामगार तरुणाभोवती फिरते, ज्याचे एका भाजी विक्रेत्या तरुणीवर निस्सीम प्रेम असते. या दोघांच्या नात्यातील हळुवारपणा आणि स्वप्ने प्रेक्षकांना भावतात. मात्र, कथेला कलाटणी तेव्हा मिळते जेव्हा ती तरुणी अचानक गायब होते. तिच्या शोधात निघालेल्या या तरुणाला मानवी तस्करी, महिला व मुलींचे शोषण आणि लैंगिक विकृतींच्या भीषण काळ्या जगाचा सामना करावा लागतो. या प्रवासातून सामाजिक विषमता, दारिद्र्य आणि मानवी मूल्यांवर दिग्दर्शकाने प्रभावी भाष्य केले आहे.

दर्जेदार निर्मिती आणि प्रभावी तांत्रिक बाजू
उत्तम छायाचित्रण आणि दर्जेदार निर्मितीमूल्ये हे या चित्रपटाचे बलस्थान ठरले आहे. अभय बलकवडे यांनी कार्यकारी निर्माता आणि छायाचित्रणाची (Cinematography) जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली असून, प्रत्येक फ्रेममधून कथेचे गांभीर्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आहे. रुद्र जाडोन यांच्या कथेला प्रकाश त्रिपाठी यांच्या संगीताची लाभलेली जोड चित्रपटाला अधिक उठावदार बनवते. प्रभावी सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

प्रमुख भूमिका आणि कलाकार
चित्रपटात मुख्य भूमिकेत संजय बिश्नोई आणि इशिता सिंग यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यांना हनुमान सोनी, प्रेरणा मेहूड, धनंजय सरदेशपांडे, प्रताप भोसले आणि गुलामअली भालदार यांसारख्या कसलेल्या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिकांद्वारे मोलाची साथ दिली आहे. रुद्र जाडोन यांचे दिग्दर्शन आणि संजय बिश्नोई, इशिता सिंग व प्रताप जाडोन यांची निर्मिती असलेला हा चित्रपट दि. 6 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!