Today सोमवार, 3rd ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

New IT Hub in Pune: पुण्याला मिळणार दुसरे ‘IT हब’; हिंजवडीतील कंपन्यांचं स्थलांतर रोखण्यासाठी सरकारचा मास्टरप्लान तयार

New IT Hub in Pune: पुण्याला मिळणार दुसरे ‘IT हब’; हिंजवडीतील कंपन्यांचं स्थलांतर रोखण्यासाठी सरकारचा मास्टरप्लान तयार

New IT Hub in Pune: पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क सध्या वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांच्या गंभीर विळख्यात सापडले आहे. या समस्यांमुळे त्रस्त झालेल्या अनेक बड्या कंपन्यांनी पुण्यातून आपला गाशा गुंडाळून इतर राज्यांमध्ये जाण्याचे संकेत दिले होते. आयटी कंपन्यांचे हे संभाव्य स्थलांतर रोखण्यासाठी आणि पुण्याचे ‘आयटी हब’ हे बिरूद टिकवून ठेवण्यासाठी राज्य सरकारने आता पुरंदर येथे नवीन आयटी पार्क उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हिंजवडीला एक सक्षम आणि आधुनिक पर्याय म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे.

प्रकल्पाचे स्वरूप आणि ठिकाण
पुरंदर तालुक्यातील दिवे, कोडीत आणि चांबळी या परिसरातील सुमारे ५७२ हेक्टर गायरान जमिनीवर हा भव्य प्रकल्प साकारला जाणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नुकतीच विधानसभेत या प्रकल्पाबाबतची ताजी माहिती दिली. विशेष म्हणजे, ही सर्व जमीन सरकारी मालकीची असल्याने भूसंपादनासाठी सरकारला कोणताही अतिरिक्त आर्थिक भार सोसावा लागणार नाही, ज्यामुळे प्रकल्पाची अंमलबजावणी अधिक वेगाने होणे शक्य आहे.

 सरकारची दूरदृष्टी
हिंजवडीतील गर्दीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी पुरंदरची निवड ही एक रणनीतीचा भाग आहे. या निर्णयामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. येथे सरकारी (गायरान) जमीन उपलब्ध असल्याने भूसंपादनाचे अडथळे दूर झाले आहेत. महसूल विभागाकडून जमिनीचा ताबा मिळताच, ती विकसित करण्यासाठी एमआयडीसीकडे (MIDC) सोपवली जाईल. पुरंदरचे हवामान आणि भौगोलिक स्थिती आयटी उद्योगांच्या गरजांसाठी अत्यंत पूरक असल्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा – Pune Crime: पुणे पोलिसांच्या ‘त्या’ धडक कारवाईवर मानवाधिकार आयोगाची टांगती तलवार; बुधवार पेठेतील कोम्बिंग ऑपरेशन वादाच्या भोवर्यात

सद्यस्थिती आणि पुढील वाटचाल
आमदार विजय शिवतारे यांनी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना सरकारने स्पष्ट केले की, या जमिनीचा प्रस्ताव २७ फेब्रुवारी २०२६ रोजीच महसूल विभागाकडे पाठवण्यात आला आहे. आता केवळ मंत्रिमंडळाच्या अंतिम मंजुरीची औपचारिकता बाकी असून, त्यानंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. हिंजवडीतील कंपन्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी सरकार कटिबद्ध असून पुरंदर आयटी पार्क हा या समस्येवर प्रभावी तोडगा ठरेल, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. या प्रकल्पामुळे पुण्यातील आयटी क्षेत्राला पुन्हा एकदा भरारी घेण्याची संधी मिळणार असून हजारो तरुणांसाठी रोजगाराची नवीन दारे उघडली जाणार आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!