Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra Weather: राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरूचं! मराठवाड्यावर अवकाळी पावसाचं सावट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट

Maharashtra Weather: राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरूचं! मराठवाड्यावर अवकाळी पावसाचं सावट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट

Maharashtra Weather: राज्यात गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत गारांसह पाऊस पडला. मात्र आता हवामानात पुन्हा मोठा बदल होत असून उन्हाचा तीव्रतेने अनुभव येऊ लागला आहे. तापमान झपाट्याने वाढत असून कमाल पारा पुन्हा 40 अंशांच्या दिशेने जात आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस राज्यात उष्णतेची लाट जाणवणार असून काही भागांत पावसाची शक्यताही कायम आहे. मुंबईसह किनारपट्टी भागात उष्ण आणि दमट हवामानाचा त्रास वाढणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात एकीकडे उकाडा तर दुसरीकडे अवकाळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुढील दिवसांसाठी हवामान विभागाचे अंदाज असे:

  • 23 मार्च:
    मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी येथे उष्णतेचा यलो अलर्ट.
    सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता.
  • 24 मार्च:
    मुंबई, ठाणे, रायगड येथे उष्ण व दमट हवामानाचा इशारा.
    सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड येथे पावसाचा अंदाज, तर सातारा, सांगली, पुणे, हिंगोली येथे हलक्या सरींची शक्यता.
  • 25 मार्च:
    सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड येथे जोरदार पावसाचा यलो अलर्ट.
    मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता.
  • 26 मार्च:
    यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली येथे वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा.

दरम्यान, आज राज्यातील काही भागांत तापमानात वाढ नोंदवली गेली. वाशिम, अकोला, अमरावती, सांगली, सोलापूर आणि ठाणे येथे 36 ते 37 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले, तर इतर भागांत तापमान 35 ते 36 अंशांच्या दरम्यान राहिले. त्यामुळे येत्या काही दिवसांत नागरिकांना उकाडा आणि बदलत्या हवामानाचा दुहेरी त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!