Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सुलभा उबाळे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र; पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शिंदे सेनेत प्रवेश

सुलभा उबाळे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र; पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शिंदे सेनेत प्रवेश

पिंपरी: काही दिवसांपूर्वीच शिवसेना (उबाठा) पक्षाच्या पिंपरी चिचवड शहराध्यक्षपदी संजोग वाघेरे यांची निवड झाली. त्यानंतर काही दिवसांत पक्षाला मोठे भगदाड प्रडले आहे. शहरातील आक्रमक चेहरा म्हणून परिचित असलेल्या माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांनी ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितत शिंदेच्या शिवसेनेच प्रवेश केला. पिंपरी चिंचवड महापालिकेत १९९७ च्या निवडणकीत सर्वसाधारण जागेवर त्या शिवसेनेकडून नगरसेविका म्हणून प्रथम विजयी झाल्या. तीन वेळा महापालिकेत नगरसेविका म्हणून त्यांनी कारकिर्द गाजवली. विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला पळता भुई थोडी केली.

महापालिका सभागृहातील अभ्यासू आणि आक्रमक नगरसेविका म्हणून त्यांचा दबदबा आहे. हवेली तालुक्याचे विभाजन झाल्यानंतर नव्याने निर्माण झालेल्या भोसरी विधानसभा मतदारंघातून तत्कालीन आमदार विलास लांडे यांच्याविरोधात त्यांनी चुरशीची लढत दिली. त्यावेळी अवघ्या १२०० मतांनी पराभव झाला होता. पुढे २०१४ मध्ये त्यांना पुन्हा शिवसेनेने उमेदवारी दिली होती. दोन वेळा त्यांचा पराभव झाला. शिवसेनेचा सलग तीस वर्षांचा सलोखा संपवून सुलभा उबाळे यांनी शिंदे यांच्याबरोबर जाणे पसंत केल्याने शहरात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मागील तीन महिन्यांपासून त्यांच्या पक्षांतराची चर्चा होती. अत्यंत कठोर अंतःकरणाने विकास कामे होण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या बरोबर राहून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संघटन शहरात मजबूत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!