Latur Crime : कौटुंबिक कलहातून एका विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना औसा तालुक्यातील खरोसा येथे घडली आहे. रविवारी, १९ एप्रिल रोजी रात्री निकिता अमरदीप भुरे (वय २५) या महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, एकाच वेळी मायलेकांवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ कुटुंबीयांवर आली.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, निकिता भुरे या गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वादा मुळे तणावात होत्या. रविवारी रात्री त्यांनी टोकाचे पाऊल उचलत ग्रामपंचायतीजवळील विहिरीत दोन्ही मुलांसह उडी घेतली.
या घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. किल्लारी पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने तिन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी लामजना येथील आरोग्य केंद्रात पाठवले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येमागच्या नेमक्या कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.


