मुंबई : सध्या अनेक सिनेमा रिलीज केले जात आहेत. त्यात परेश रावल सध्या अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, टीव्हीवर विनोद अधिक चांगल्या प्रकारे सादर केला जात आहे, असे त्यांना वाटते. टेलिव्हिजनवरील कार्यक्रम मोठ्या बजेटच्या चित्रपटांना टक्कर देत आहेत. कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांचा शो आणि त्यांची विनोदी शैली उत्कृष्ट आहे.
परेश रावल म्हणाले की, आजकाल विनोदी चित्रपटांना टीव्ही आणि डिजिटल कार्यक्रमांकडून, विशेषतः ‘द कपिल शर्मा शो’कडून कडवी स्पर्धा मिळत आहे. त्यांनी सुनील ग्रोव्हर यांचे कौतुक करत त्यांना प्रतिभेचा ज्वालामुखी म्हटले. जेव्हा तुम्ही ‘द कपिल शर्मा शो’ पाहता आणि सुनील ग्रोव्हरसारखी प्रतिभा पाहता, तेव्हा तुम्हाला वाटते की हे लोक ज्वालामुखीसारखे अद्भुत आहेत. विनोदाच्या त्या पातळीशी स्पर्धा करण्यासाठी, तुम्हाला तुमची विचारसरणी बदलावी लागेल; नाहीतर ते अशक्य आहे. विनोद लिहिणे आणि त्यात सातत्य राखणे खूप कठीण आहे.
कॉमेडी शो साठी १०-१५ लोकांची टीम मिळून लिखाण करते. आणि इथे, निर्मात्यांकडे लेखक नेमण्याइतकेही बजेट नसते, मग त्यांना १५ जणांची टीम कुठून मिळणार? कॉमेडीसाठी हा कठीण काळ आहे. स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे. कपिल शर्माचा शो प्रत्येक कॉमेडी चित्रपटासाठी रोजची स्पर्धा आहे.


