Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामानाचा अंदाज काय?

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामानाचा अंदाज काय?

Maharashtra weather : राज्यात सध्या हवामानाचा अनोखा बदल पाहायला मिळत आहे. एका बाजूला कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत, तर दुसऱ्या बाजूला पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी वातावरणात दिलासा निर्माण केला आहे.

आजही काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण आणि विदर्भातील काही भागांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या किनारी भागांत उष्ण व दमट हवामानाचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे दुपारच्या वेळेत बाहेर पडताना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

विदर्भात अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असून आरोग्याच्या दृष्टीने सतर्क राहणे आवश्यक आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वातावरण अस्थिर झाल्याने दुपारनंतर वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसेच परभणी, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या भागांत वाऱ्याचा वेग वाढून विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मागील २४ तासांत राज्यातील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. अमरावती येथे सर्वाधिक ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर अकोला आणि वर्धा येथेही तापमान ४४ अंशांच्या आसपास राहिले. नागपूर, भंडारा, गडचिरोली आणि यवतमाळ येथेही तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले आहे. उलट, महाबळेश्वर येथे १६.३ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदवले गेले.

गेल्या काही दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजांसह हलका ते मध्यम पाऊस झाला असून काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत झालेल्या जोरदार सरींमुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!