Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

SSC Results: ना ‘एक’ कमी, ना ‘एक’ जास्त! ९० टक्क्यांच्या गर्दीत ३५ टक्क्यांचीच चर्चा; श्रुतीची अजब किमया

SSC Results: ना ‘एक’ कमी, ना ‘एक’ जास्त! ९० टक्क्यांच्या गर्दीत ३५ टक्क्यांचीच चर्चा; श्रुतीची अजब किमया

SSC Results: दहावीचा निकाल म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते ९०-९५ टक्क्यांचे डोंगर सर करणारे गुणवंत. मात्र, यंदा नांदेड जिल्ह्यात एका अशा निकालाची चर्चा आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कंधार तालुक्यातील श्रुती दिगंबर पाटील भानानगरे या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत सर्वच विषयांत नेमके ३५ गुण मिळवून ‘काठावर पास’ होण्याचा अजब विक्रम केला आहे.

सहाही विषयात ‘३५ पैकी ३५’!
श्रुतीचा निकाल हा गणिताच्या आकड्यांपेक्षाही अधिक रंजक ठरला आहे. तिला सहाही मुख्य विषयांत १०० पैकी ३५ गुण मिळाले आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या सर्व विषयांच्या रकान्यात ‘३५’ हाच आकडा झळकत आहे. तिच्या या ‘परफेक्ट’ ३५ टक्क्यांच्या निकालाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

शेतकरी कन्या अन् जिद्दीचा प्रवास
श्रुती ही बारूळ येथील शिवाजी हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. तिची परिस्थिती बेताची असून वडील दिगंबर पाटील शेती करतात. श्रुती केवळ अभ्यासच करत नाही, तर शाळेतून आल्यावर आई-वडिलांना शेतात राबून मदतही करते. घरची कामे आणि शेती सांभाळून तिने मिळवलेले हे यश अनेक पदवीधरांपेक्षाही मोठे मानले जात आहे, कारण तिच्यासाठी उत्तीर्ण होणे हेच एक मोठे आव्हान होते. “यश फक्त मोठ्या आकड्यांत नसते, तर ते मिळवलेल्या जिद्दीत असते,” हेच श्रुतीने आपल्या निकालातून दाखवून दिले आहे. ९० टक्क्यांच्या शर्यतीत श्रुतीच्या या ‘३५’ गुणांचे कौतुक कौशल्याने कमी आणि आपुलकीने जास्त केले जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!