Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nashik TCS Case: ‘शिक्षित मुस्लिम तरुण टार्गेटवर’; निदा खानच्या अटकेनंतर ओवेसी आक्रमक, नाशिक प्रकरणाला राजकीय वळण

Nashik TCS Case: ‘शिक्षित मुस्लिम तरुण टार्गेटवर’; निदा खानच्या अटकेनंतर ओवेसी आक्रमक, नाशिक प्रकरणाला राजकीय वळण

Nashik TCS Case: नाशिकमधील बहुचर्चित ‘टीसीएस’ धर्मांतरण आणि लैंगिक छळ प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिच्या अटकेनंतर एमआयएम (MIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी थेट मैदानात उतरून तिची बाजू सावरली आहे. “हे केवळ धर्मांतरणाचे प्रकरण नसून सुशिक्षित मुस्लिम तरुणांच्या प्रगतीला खिळ घालण्यासाठी रचलेला हा एक सुनियोजित राजकीय डाव आहे,” असा दावा ओवेसी यांनी केला.

‘मिडिया ट्रायल’ कशासाठी?
पत्रकार परिषदेत बोलताना ओवेसी यांनी तपास यंत्रणा आणि तक्रारदारांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तक्रारदार व्यक्ती ही सत्ताधारी पक्षाशी संबंधित असून केवळ राजकीय सूडबुद्धीतून हे आरोप लावण्यात आले आहेत. निदा खान कधीच एचआर (HR) विभागात कार्यरत नव्हती आणि तक्रार दाखल होण्यापूर्वीच तिची त्या ठिकाणाहून बदली झाली होती, मग तिला ‘मास्टरमाइंड’ कसे ठरवले जात आहे? असा सवाल ओवेसींनी केला. पोलिसांनी जप्त केलेल्या बुरखा आणि धार्मिक पुस्तकांवरून ओवेसींनी संताप व्यक्त केला. “घरात धार्मिक ग्रंथ असणे किंवा बुरखा मिळणे हा गुन्हा कधीपासून ठरला?” असा रोकठोक प्रश्न त्यांनी विचारला.

‘न्यायदेवतेवर विश्वास, सत्य बाहेर येईल’
भूतकाळातील काही प्रकरणांचा संदर्भ देत ओवेसी म्हणाले की, याआधीही उर्दू साहित्यावरून तरुणांना गोवण्यात आले होते, मात्र न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले. निदा खानच्या बाबतीतही कायद्याच्या लढाईत सर्व खोटे आरोप गळून पडतील आणि तिला न्याय मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे पोलीस केवळ एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!