Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३० जूनपूर्वी खात्यात पैसे जमा होणार

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३० जूनपूर्वी खात्यात पैसे जमा होणार

Maharashtra Farmer Loan : महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्याची तयारी सुरू केली असून, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 30 जूनपूर्वी रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. सहकार विभागाने यासंदर्भातील सविस्तर माहिती सरकारकडे सादर केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या कर्जदारांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे 34 ते 35 लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचे सांगितले जात आहे.

कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार विभागाने विविध बँकांकडून शेतकऱ्यांची माहिती संकलित केली आहे. यात कर्ज रक्कम, खाते तपशील, आधार क्रमांक, जमीन नोंदी, परतफेडीची माहिती आणि पीककर्जाचा तपशील यांचा समावेश आहे.

सध्या सरकारकडून अंतिम निकष निश्चित करण्याचे काम सुरू असून मे अखेरीस होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही सरकार प्रोत्साहनपर अनुदानाचा विचार करत आहे. वेळेत कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!